शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST

गेल्यावर्षीपासून कोरोनाचे वादळ घोंगावतेय. गेल्यावर्षीही ऐन परीक्षेच्या काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा कहर ...

गेल्यावर्षीपासून कोरोनाचे वादळ घोंगावतेय. गेल्यावर्षीही ऐन परीक्षेच्या काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा कहर कायम असल्याने, यावर्षी शाळा सुरू होण्यास तब्बल जानेवारी महिन्याची वाट बघावी लागली. अनेक शाळांमध्ये ॲानलाईन उपक्रम सुरू असला तरी तो नावालाच होता.

दरम्यान, फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, ज्या शाळा सुरू झाल्या होत्या, त्या देखील बंद झाल्या. दरम्यान, जेवढा कालावधी शाळा सुरू होता, त्याकाळात काही शाळांनी चाचणी परीक्षा घेतल्या. ॲानलाईन अभ्यास घेतला. एवढी तयारी केल्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थी वर्गातही काहीशी नाराजी आहे. शाळास्तरावर ॲानलाईन परीक्षा घेणे सहज शक्य आहे. मात्र, शाळांनीही हात झटकल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षा रद्द झाल्या तर गुणवत्ता कशी समजणार, असा प्रश्न आहे.

शाळास्तरावर चाचणी परीक्षा घेतली तर ॲानलाईन परीक्षा घेण्यात कुठलीही अडचण यायला नको. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे अयोग्य आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ॲाफलाईन शक्य नसल्याने, ॲानलाईन घेतली पाहिजे. अे.पी.जोशी

माजी प्राचर्य पालेशा शिक्षणशास्त्र महाविद्यालय

कोरोनाचे संकट असल्याने, शिक्षण विभागाने पुन्हा एकदा परीक्षा रद्द केलेल्या आहेत. मग ॲानलाईन शिक्षणाचा उपयोग काय झाला? ते समजेनासे आहे. किमान शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ॲानलाईन पद्धतीने घेऊन गुण दिल्यास विद्यार्थ्याची प्रगती समजू शकेल.

- संभाजी पाटील,

पालक,

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला असला तरी शेवटी विद्यार्थ्यांची प्रगतीही महत्त्वाची आहे. परीक्षा रद्द होत असल्याने, त्यांच्यातील अभ्यासाची गोडी कमी होईल. त्यामुळे ॲाफलाईन परीक्षा तरी झाल्याच पाहिजे. तरच त्याचा फायदा होईल.

- एस.बी. कुळकर्णी,

पालक,

राज्यात कोरोनाचे संकट अतिशय गडद झालेले आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत. मात्र सलग दोन वर्षांपासून विद्यार्थ्याच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठविले जात आहे. मात्र ही ढकलगाडी काय कामाची, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.