शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ योजनेत गावे निवडीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST

धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मी समृद्ध, ...

धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ या योजनेसाठी जिल्ह्यातील गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना तहसीलदारांना केल्या आहेत, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी दिली.

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ या योजनेत प्रत्येक तालुक्यात दहा गावांची निवड करावी, अशा सूचना नाशिक विभागाचे रोहयो उपायुक्त अर्जुन चिखले यांनी दोन महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कामांची आढावा बैठकदेखील झाली होती. रोहयो उपायुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीला रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खोतकर, पंचायत समितीचे सर्व गट विकास अधिकारी, उपवनसंरक्षक भोसले, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी कुलकर्णी यांच्यासह यंत्रणेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रोहयो कामांचा तालुकानिहाय आणि कामनिहाय आढावा घेण्यात आला. नवीन कामांना मंजुरी देणे, अपूर्ण कामे पूर्ण करणे, तपासण्या, तक्रारी, जीओ टॅगिंग आदींबाबत सूचना देऊन नियमाप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ या योजनेत प्रत्येक तालुक्यात १० गावांची निवड करून रोहयोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश यंत्रणेला दिले होते. त्यानुसार धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्रीसह सर्व तहसीलदारांना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना राेहयो उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले आहे. गावांची निवड करण्याची प्रक्रिया तालुका स्तरावर सुरू असली तरी निवड केलेल्या गावांची यादी अजून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ योजनेत रोहयोच्या माध्यमातून गाय व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग उभारणे, पशुधन गटांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे, शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आदी कामे करण्यात येणार आहेत.