शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात एकही अपघात नाही, कारखान्यांबद्दल तकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST

४ मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर माधव रत्नपारखी यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिकस्थितीविषयी सविस्तर ...

४ मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर माधव रत्नपारखी यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिकस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.

नवीन कामगार कायद्यानुसार २० व त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांचीच नोंद औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे करण्यात येत असते. धुळे जिल्ह्यात अशा नोंदणीकृत कारखान्यांची संख्या २८१ एवढीच असून, त्यात काम करणाऱ्यांची संख्या १४ हजार ५०० एवढी आहे. तर धुळ्यातील अवधान एमआयडीसीत फक्त ५३ कारखाने असल्याची या विभागाकडे नोंद आहे.

कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराची सुरक्षा तेथील व्यवस्थापनाने घेणे गरजेचे आहे. या कारखान्यांमध्ये सुरक्षिततेचे उपाय आहेत की नाही या दृष्टीने केंद्रीय निरीक्षण प्रणालीनुसार कारखान्यांना भेटी दिल्या जातात. सुरक्षेच्यादृष्टीने कारखान्यांना सूचना दिल्या जातात. त्रुटी असल्यास त्या पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

एकच धोकादायक कारखाना

जिल्ह्यात केवळ शिरूड येथील कारखानाच धोकेदायक असल्याची नोंद आहे. या ठिकाणी त्रयस्थांकडून ॲाडिट केले जाते. या कारखान्याचाही स्वत:चा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा आहे.

एकही अपघाताची नोंद नाही

जिल्ह्यात असलेल्या कारखान्यांमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत एकही प्राणघातक अपघात झाल्याची नोंद नाही. अपघातच नसल्याने कोणालाही अपंगत्व आलेले नाही हे विशेष आहे.

अपघाताची तीन महिन्यात चौकशी

कारखान्यात अपघात झाल्यानंतर तीन महिन्यातच त्याची सविस्तर चाैकशी करण्यात येते. त्यानंतर खटला न्यायालयात दाखल करण्यात येत असतो.

कारखान्यात महिला तक्रार निवारण समिती

कारखान्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाते. ज्या कारखान्यांमध्ये महिला कामगार आहेत, तेथे महिला तक्रार निवारण समिती असणे गरजेचे आहे. जोपर्यंत ही समिती गठीत होत नाही, तोपर्यंत कारखान्याची नोंदणी, नूतनीकरण होत नाही. जिल्ह्यात ४७ कारखान्यांमध्ये महिला काम करतात. तेथे ही समिती कार्यान्वित आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये गेल्यावर्षी एकही अपघात झालेला नाही. तसेच कारखान्यांबद्दल कामगारांची तक्रारही नाही. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी कारखाना व्यवस्थापनाकडून घेतली जाते.

- माधव रत्नपारखी,

उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग,धुळे