शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

वर्षभरात एकही अपघात नाही, कारखान्यांबद्दल तकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:08 AM

४ मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर माधव रत्नपारखी यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिकस्थितीविषयी सविस्तर ...

४ मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर माधव रत्नपारखी यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिकस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.

नवीन कामगार कायद्यानुसार २० व त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांचीच नोंद औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे करण्यात येत असते. धुळे जिल्ह्यात अशा नोंदणीकृत कारखान्यांची संख्या २८१ एवढीच असून, त्यात काम करणाऱ्यांची संख्या १४ हजार ५०० एवढी आहे. तर धुळ्यातील अवधान एमआयडीसीत फक्त ५३ कारखाने असल्याची या विभागाकडे नोंद आहे.

कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराची सुरक्षा तेथील व्यवस्थापनाने घेणे गरजेचे आहे. या कारखान्यांमध्ये सुरक्षिततेचे उपाय आहेत की नाही या दृष्टीने केंद्रीय निरीक्षण प्रणालीनुसार कारखान्यांना भेटी दिल्या जातात. सुरक्षेच्यादृष्टीने कारखान्यांना सूचना दिल्या जातात. त्रुटी असल्यास त्या पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

एकच धोकादायक कारखाना

जिल्ह्यात केवळ शिरूड येथील कारखानाच धोकेदायक असल्याची नोंद आहे. या ठिकाणी त्रयस्थांकडून ॲाडिट केले जाते. या कारखान्याचाही स्वत:चा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा आहे.

एकही अपघाताची नोंद नाही

जिल्ह्यात असलेल्या कारखान्यांमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत एकही प्राणघातक अपघात झाल्याची नोंद नाही. अपघातच नसल्याने कोणालाही अपंगत्व आलेले नाही हे विशेष आहे.

अपघाताची तीन महिन्यात चौकशी

कारखान्यात अपघात झाल्यानंतर तीन महिन्यातच त्याची सविस्तर चाैकशी करण्यात येते. त्यानंतर खटला न्यायालयात दाखल करण्यात येत असतो.

कारखान्यात महिला तक्रार निवारण समिती

कारखान्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाते. ज्या कारखान्यांमध्ये महिला कामगार आहेत, तेथे महिला तक्रार निवारण समिती असणे गरजेचे आहे. जोपर्यंत ही समिती गठीत होत नाही, तोपर्यंत कारखान्याची नोंदणी, नूतनीकरण होत नाही. जिल्ह्यात ४७ कारखान्यांमध्ये महिला काम करतात. तेथे ही समिती कार्यान्वित आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये गेल्यावर्षी एकही अपघात झालेला नाही. तसेच कारखान्यांबद्दल कामगारांची तक्रारही नाही. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी कारखाना व्यवस्थापनाकडून घेतली जाते.

- माधव रत्नपारखी,

उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग,धुळे