शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
2
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
3
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
5
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
6
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
7
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
8
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
9
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
10
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
11
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
12
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
13
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
14
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
15
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
16
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
17
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
18
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
19
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
20
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे २२ हजारांपेक्षा अधिक शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : गेल्या वर्षभरामध्ये सततचा पाऊस, अतिवृष्टी, वादळ, गारपिटीमुळे तब्बल ४४ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : गेल्या वर्षभरामध्ये सततचा पाऊस, अतिवृष्टी, वादळ, गारपिटीमुळे तब्बल ४४ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यापैकी २१ हजार ८०० शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे तर २२ हजारांपेक्षा अधिक शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसानभरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांनादेखील केवळ मदतीचा पहिला हप्ता मिळाला आहे. दुसरा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. कोरोनामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचे सांगण्यात आले.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत वादळी वारा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट व सततचा पाऊस यामुळे धुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु, ३३ टक्केवरील समाविष्ट गावांची संख्या केवळ ५०१ आहे.

१४ मे २०२० रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे १५ शेतकरी बाधित झाले होते. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ३ जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी निरंक आहे. २४ जुलै २०२० रोजी झालेल्या पावसामुळे ९६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सर्वाधिक २० हजार २८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यात धुळे तालुक्यात एकाही शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही. साक्री तालुक्यात ७ हजार ३२४, शिरपूर तालुक्यात ४ हजार ५०५, शिंदखेडा तालुक्यात ८ हजार ४५४ शेतकरी बाधित झाले आहेत.

तसेच ४ व ५ सप्टेंबर, १३ सप्टेंबर, १९ ते २४ सप्टेंबर या कालावधीत झालेले वादळी वारे, अतिवृष्टी, गारपीट व सततचा पाऊस यामुळे धुळे तालुक्यात ६९०, साक्री तालुक्यात १९ हजार ४६०, शिंदखेडात १ हजार ३५६ आणि शिरपूर तालुक्यातील ७१५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

दिनांक १४ ते २० ऑक्टोबर दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात ४२४ फलोत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दिनांक ११ ते १४ डिसेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शिंदखेडा तालुक्यात ९११ आणि शिरपूर तालुक्यात २९ अशा एकूण ९४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

दरम्यान, सन २०२१मध्येही जिल्ह्यात दोन ते तीनवेळा अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळाचा अनेक गावांना फटका बसला आहे. प्रशासनाने पंचनामा केला आहे. परंतु, शासन, प्रशासन कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा मागे पडला आहे.

दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.