शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST

कोरोनाच्या वाढत्या विषाणू संसर्गाने आता रौद्ररूप धारण केलेले आहे. दररोज तीनशेच्या पुढेच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने, प्रशासनाकडून सुरक्षेच्या ...

कोरोनाच्या वाढत्या विषाणू संसर्गाने आता रौद्ररूप धारण केलेले आहे. दररोज तीनशेच्या पुढेच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने, प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरू झालेले आहे. अशातच काहींनी मात्र भीतिपोटी मोलकरणींसाठी काही दिवसांपुरते दरवाजे बंद केले आहेत.

घराघरात कुणी भांडी धुण्याचे काम, तसेच स्वयंपाकाचे काम करून काही मोलकरीण महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. मात्र, कोरोनामुळे आता त्यांच्यावरही संकट निर्माण झालेले आहे.

अशा संकटाच्या काळात काहींनी मोलकरणींना सुट्टी दिल्याने, त्यांना काम शोधण्याची वेळ आलेली आहे.

एका घरी काम करून साधरणत: हजार ते बाराशे रुपये मिळतात. एक मोलकरीण साधारणत: चार-पाच घरी काम करीत असते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग वाढल्याने, काही घरांनी तूर्त काम बंद केले आहे. त्यामुळे आता घरी बसून राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.

एका घरातून मिळतात ५०० ते ७०० रुपये

धुळे शहरात मोलकरणींची संघटना नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक घरातून ठरावीक रक्कम मिळेल असे नाही. जसे घर व कामाचे स्वरूप असेल, त्यानुसार त्यांना पैसे मिळत असतात. मात्र, धुणीसाठी ५०० व भांडी घासण्यासाठी ५०० रुपये महिना घेतला जातो. फरशी पुसायची असल्यास त्याचेही वेगळे पैसे लागतात. एक मोलकरीण महिला पाच-सहा घरी काम करीत असते.

गेल्या चार वर्षांपासून मी घरोघरी धुणी भांडीचे काम करते. त्यातून चांगला रोजगार मिळत होता. मात्र, आता लॉकडाऊनमुळे काहीं घरांचे काम बंद झाले असून, मोजकेच घरे बाकी आहे. त्यामुळे आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे

वंदना इंगळे

मागील वर्षीही लॉकडाऊन असल्याने, अनेक घरांमधील काम बंद झाले होते. परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर लोकांकडील घरकाम सुरू झाले. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन लागल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

कमला सोनवणे

सुरुवातीला पाच-सहा घरी काम करता यायचे. त्यामुळे चांगले पैसे मिळायचे. आता लॅाकडाऊनमुळे अडचण आलेली आहे. त्यामुळे काही घरांनी तूर्त काम बंद केले आहे.

रंजना पाटील

घर कसे चालवायचे?

काही महिन्यांपासून महागाई गगनाला भिडलेली आहे. त्यातच आता कामाचे संकट निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीत घर कसे चालवायचे, हा प्रश्नच आहे. त्यामुळे शासनाने आम्हालाही मदत करावी.