शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै-ॲागस्ट २०२० मध्ये संपली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. नोव्हेंबरमध्ये राज्य निवडणूक ...

जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै-ॲागस्ट २०२० मध्ये संपली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. नोव्हेंबरमध्ये राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार धुळे तालुक्यातील ७२, शिंदखेडा ६३, साक्री ४९ व शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा यात समावेश होता. जिल्ह्यातील ७४७ प्रभागातून १९८८ सदस्य निवडीसाठी तब्बल ६ हजार २०८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीपर्यंत २ हजार ३७५ उमेदवारांनी माघार घेतली. तसेच जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायतींसह तब्बल ५१२ सदस्यांची निवड बिनविरोध निवड झाल्याने, १४७६ जागांसाठी ३ हजार ३१९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी ३ लाख ७९ हजार ८१३ पैकी २ लाख ९२ हजार १४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केलेले आहे. मतदानाची टक्केवारी ७७ टक्के एवढी राहिली. सर्वाधिक मतदान साक्री तालुक्यात ७७.६३ टक्के झाल्याची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल धुळे तालुक्यात ७७.१७, शिरपूर ७६.३६ व शिंदखेडा तालुक्यात ७६.३४ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मतदानानंतर मतदान यंत्र तालुक्याच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली असून, त्याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

मतमोजणीची जय्यत तयारी पूर्ण

दरम्यान शुक्रवारी झालेल्या मतदानाची सोमवारी १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.साधारणत: साडेदहा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे.

कोणाचे वर्चस्व राहणार?

कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका अतिशय सुरळीत पार पडल्या आहेत. माघारीपर्यंत ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, त्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर अनेक पक्षांनी आपला झेंडा फडकल्याचा दावा केलेला आहे. मात्र सोमवारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

विशेष म्हणजे धुळे, साक्री, शिंदखेडा, व शिरपूर तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये अतिशय चुरशीच्या लढती झालेल्या असून, या गावांच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.