शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या सिंचनाकरिता शेतकऱ्यांची रात्रपाळी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST

बळसाणे : शेतकऱ्यांला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, मात्र त्यांच्या जीवावर राजकीय खुर्ची उबविणारे मात्र त्याच्याकङे नेहमी दुर्लक्ष करीत असतात. ...

बळसाणे : शेतकऱ्यांला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, मात्र त्यांच्या जीवावर राजकीय खुर्ची उबविणारे मात्र त्याच्याकङे नेहमी दुर्लक्ष करीत असतात. दिमतीला लाखोंची जमीन असली तरी ती सिंचित करून पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात रात्रभर राबवावे लागते. शिवारात अनोळखी इसमांकडून दगा फटका , प्राण्यांचा हल्ला तसेच विषारी प्राण्यांच्या दंशाची भीती देखील शेतकऱ्यांना सतावते.

काही वर्षापूर्वी बळसाणेसह माळमाथ्था परिसरात शेतात राबतांना सर्पदशांने शेतकऱ्यास जीव ही गमवावा लागला आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत माळमाथा भागात अशा घटना घडल्या नसल्या, तरी केव्हा कुठली अनाहुत घटना पुढे येईल याची शाश्वती सांगता येणार नाही. शेतकऱ्यांना २४ तास व दिवसा वीजपुरवठा करण्याच्या राज्यकर्त्यांच्या घोषणा व घोषणाच राहिल्या आहेत.

रात्रपाळीला शेतकऱ्यांना वावरात सरपटणारे प्राणी व हिंस्र प्राण्यांचा लागलेला डर यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी बळसाणे , दुसाणे , इंदवे , हाट्टी खुर्द , ऐचाळे , लोणखेडी , कढरे , सतमाने , अमोदा छावडी , अगरपाडा , घानेगाव , नागपूर वर्धाने आदी माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सध्या बळसाणे शेतशिवारात महावितरणकडून शेतीला सकाळची साडेआठ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत वीजपुरवठा होतो. आणि रात्री सव्वादहा ते सकाळी सव्वाआठ वाजेपर्यंत असे चार - चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त शेतीला वीज मिळत नसल्याची खंत नवल इंदा पाटील यांनी केली.

आठवड्याचे काही दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. यामुळे शेतीला कायम दिवसागणिक वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी बळसाणे गावासह माळमाथा भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

गेल्यावर्षी माळमाथा भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे छोटे मोठे प्रकल्प व बंधाऱ्यात पाणी उपलब्ध आहे. शिवाय विहीर , बोअर हे देखील भरले आहेत. त्यात रब्बी हंगाम ही बहरला असून काही शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणामुळे फटाका ही बसला आहे. शेतातील पीक जगविण्यासाठी शेतकरी रात्री बेरात्री शेतात पाणी देण्यासाठी जात आहे.

रात्री उशिरा वीज येत असेल त्यावेळी सोबत बँटरी , काठी घेऊन जावे लागते. त्यात खराब शेतरस्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची वाट ही बिकट झाली आहे. त्यात तांत्रिक अडचण आली आणि वीज गुल झाल्यावर शेतकऱ्यास रात्रीचा मुक्काम शेतातच ठोकावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

रात्री बेरात्री पिकांना पाणी देतांना हिंस्त्र प्राणी , सापांसह सरपटणारे प्राण्यांचा हल्ला होण्याचे प्रकार ही यापूर्वी घडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या कारणाने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांचा जीवावर उठत आहे. अशा कुठल्याही प्रकारचा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून दिवसा वीजपुरवठा करावा अशी चर्चा आपसात शेतकरी वर्गातून होत आहे.

प्रतिक्रिया

रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार झाला आहे. जंगल म्हटल्यावर हिंस्र प्राण्यांच्या व सापासह सरपटणारे प्राण्यांची भीती लागते. त्यात रात्रीची वीज बंद झाल्यावर अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.

किशोर शंकर हालोरे ( शेतकरी , बळसाणे )

प्रतिक्रिया नंबर , २

महाराष्ट्र वीज नियामक आयोगानुसार व वरिष्ठ स्तरावरुन शेतीसाठी वीजपुरवठाबाबत आलेल्या शेड्यूलनुसार सध्या शेतीला वीजपुरवठा केला जातो. शेतीला दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळांमध्ये वीजपुरवठा होत आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये याकडेही लक्ष दिले जाते आहे.

आर. बी. जोशी

कार्यकारी अभियंता , दोंडाईचा