शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

रानभाज्या खा अन्‌ निरोगी राहा....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:40 AM

धुळे : शेती किंवा निसर्गत: उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हटले जाते. पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी या रानभाज्या ...

धुळे : शेती किंवा निसर्गत: उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हटले जाते. पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी या रानभाज्या उगवत असतात; मात्र त्या ओळखता येणे गरजेचे आहे. रानभाज्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने इच्छा असूनही त्या अनेकांकडून घेतल्या जात नाहीत. या रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या असतात. त्यात खते वापरलेली नसतात. या भाज्यांमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये, अत्यंत उपयोगी रसायने आणि सर्वात महतत्त्वाचे म्हणजे अनेक औषध गुणधर्मही असतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी या रानभाज्या फार महत्त्वाच्या आहेत. या रानभाज्या रोगप्रतिकारशक्तीही वाढवित असतात. त्यामुळे त्या आवर्जुन खाल्ल्या पाहिजे; मात्र हे करीत असताना ज्यांना रानभाज्यांची माहिती आहे, अशांकडूनच त्या खरेदी केल्या पाहिजे. त्याचे महत्त्व समजून घेणेही महत्त्वाचे आहे.

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

करटोली

करटोलीचे फळ कडवट, उष्ण संसर्गरक्षक आहे, तसेच पोट साफ होण्यासाठीही उपयुक्त आहे. रक्तशर्करा नियंत्रणासाठी ही भाजी गुणकारी आहे.

सुरण

सुरण या रानभाजीत अ,ब,क ही जीवनसत्वे आहेत. आतड्यांच्या रोगात सुरणाची भाजी गुणकारी ठरते, तसेच दमा, मूळव्याध, पोटदुखी, रक्त विकारावर उपयोगी.

गुळवेल

गुळवेल महत्त्वाची औषध वनस्पती आहे. ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे. या वनस्पतीत प्रथिनांचे प्रमाण ११.२ एवढे असते.

टाकळा

टाकळ्याच्या पानात विरेचन द्रव्य व लालरंग असतो. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचारोगात गुणकारी आहे. टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.

आंबुशी

आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. पचनास हलकी असून, भूकवर्धक आहे. आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन कमी होऊन रक्तस्त्राव बंद होतो. आंबुशीमध्ये खनिज द्रव्याचे प्रमाण मुबलक प्रमाणात आहे.

रानभाज्या, वनभाज्या या कुठेना कुठे उगवतच असतात. त्यामुळे त्या नष्ट झाल्या, असे म्हणता येणार नाही. उलट कृषी विभागाने नवीन भाज्यांचा शोध घेतला पाहिजे. त्यावर संशोधन केले पाहिजे, अशी अपेक्षा रानभाजी महोत्सवाचे निर्माते चैत्राम पवार यांनी व्यक्त केलेली आहे.

वनभाज्या या नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या असतात. त्यात खतांचा, रासायनिक कीटकनाशकांचा वापर नसतो. या वनभाज्या औषध गुणधर्मीय असतात. त्यांचा आहार घेतला पाहिजे.

- डॉ. संजय शिरसाठ