शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

विद्यार्थी हिताच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:34 AM

निर्णय योग्य कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या ...

निर्णय योग्य कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता योग्य निर्णय आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक पुन्हा एकदा तुटणार आहे. शासनाने याबाबत ठोस उपाययोजना काय याबद्दल मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

-कैलास जैन, चेअरमन हस्ती स्कूल दोंडाईचा

सुरक्षित निर्णय

कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दहावी-बारावीचा परीक्षा होणे गरजेचे असले तरी त्या सुरक्षित वातावरणात होणे त्याहून जास्त गरजेचे आहे. शिक्षणमंत्र्यांनी घेतला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, प्रशासन व पालकांना सोयीचे होईल. हिमांशू शाह, चेअरमन रोटरी इंग्लिश स्कूल, दोंडाईचा

दडपण आले असते

आजच्या विपरीत परिस्थितीत बरेच विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक कोरोना बाधित आहेत. ऑनलाइन अभ्यास जेमतेम ३०-४० टक्के झाला आहे. परीक्षा आता घेतल्याचे असत्या तर विद्यार्थी व शिक्षक यांचा मनावर दडपण आले असते. प्राचार्य डी. एन. जाधव, दोंडाईचा

आतापासून अंदाज घ्यावा

कोरोनाच्या परिस्थितीत दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचे स्वागत आहे. पुढे कशी परिस्थिती राहील याचा अंदाज आज घेणे मुश्किल असले तरी याबाबत आतापासूनच नियोजन असण्याची गरज आहे.

प्राचार्य शरद शर्मा, दोंडाईचा

विद्यार्थ्यांना वेळ मिळेल

कोविड-१९ची स्थिती लक्षात घेऊन शासनाने दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शासनाचा हा अगदी योग्य निर्णय आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासास पुरेसा वेळ मिळणार आहे. -महेश मुळे, धुळे

परीक्षेची टांगती तलवार कायम

सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी, दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. सततच्या अभ्यासामुळे पठारावस्था येण्याची भीती निर्माण झाली आहे. परीक्षेच्या दडपणाची टांगती तलवार अजून कायम राहणार आहे. या विद्यार्थ्यांना सध्या अभ्यासाचा ताणातून तूर्त तरी मुक्त होता येणार नाही.

प्राचार्य डी. एन. पाटील, साक्री

सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय व्हावा

१०वी व १२वीची परीक्षा विद्यार्थ्यांचं करियर ठरविणाऱ्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनाचा बोजवारा उडाला आहे. शिक्षक असो वा विद्यार्थी या मुख्य घटकांना विश्वासात न घेता, प्राप्त परिस्थितीचा विचार न करता परीक्षेच्या वेळांत परस्पर बदल करणे कुणाच्याच हिताचे नाही. त्यातून चुकीचा संदेश ही जात आहे. यामुळे परीक्षेचे गांभीर्य ही कमी झाले आहे.

प्राचार्य राजेंद्र अग्रवाल, साक्री