शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीच्या रजेचा कर्मचाऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:19 IST

दोंडाईचा: एस.टी.महामंडळाच्या निर्णयामुळे आगारातील चालक-वाहकांसह ३०६ कर्मचाऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने प्रवाशी बस वाहतूक बंद केली तर चालक- वाहक यांची हजेरी लावायचा नियम आहे. परंतु कोरोना महासंकटात महामंडळ प्रशासन हे सोयिस्करपणे विसरल्याचे दिसत आहे. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून या आपत्तीत महामंडळाने चालक-वाहकांना सक्तीच्या २० दिवस रजेवर जाण्याचा फतवा जारी केला आहे. दोंडाईचा आगारातील ३०६ कर्मचाºयांना याचा फटका बसणार असणार असल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. हा फतवा मागे घेण्याची मागणी कर्मचाºयांनी केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एस.टी. महामंडळाने मार्च महिन्यापासून प्रवाशी वाहतूक बंद केली आहे. मध्यंतरी वाहतूक पुन्हा सुरू केली. परंतु त्यास अल्पसा प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा प्रवाशी वाहतूक बंद झाली. महामंडळाचे वाढते नुकसान बघता दोंडाईचा आगाराने माल वाहतूक सुरू केलीआहे. दोंडाईचा आगारात ५९ बसेस असून चालक-वाहक २२९ आहेत.चालक-वाहक यांना वषार्तून ४० दिवस रजा घेता येतात. त्यात २० दिवस मंदिच्या दिवसात तर उरलेल्या २० सुट्या गरजेनुसार घेता येतात. नैसर्गिकआपत्ती, संचारबंदी, सार्वजनीक आंदोलन काळात प्रशासनाने वाहतूक बंद केली तर चालक-वाहक यांचा पगार कापू नये,असे प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले होते.कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून यात चालक-वाहक यांना मंदिच्या नावाखाली २० दिवस सक्तीच्या रजेवर पाठविणे, अन्यायकारक असल्याचे चालक-वाहकांसह कर्मचारी यांचे मत आहे. आगारात अगोदरच चालक-वाहक यांची संख्या कमी असून गर्दीच्या काळात गरज असतानाही सुटी मिळत नसल्याची तक्रार आहे. आता गरज नसताना नाहक सक्तीचा रजेवर पाठविले जात असल्याने दोडाईचा सह जिल्यातील चालक-वाहक यांचात असंतोष निर्माण झाला आहे. दोंडाईचा आगारातील ३०६ कर्मचाºयांना याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या अगोदरच महामंडळाने जून महिन्याच्या ५० टक्के पगार कापला आहे.सक्तीचा रजेचा फतवा रद्द करावा,अशी मागणी सर्वच कर्मचाºयांनी महामंडळाकडे केली आहे.अन्यायकारण निर्णय : चत्रेकोरोनामुळे बसेस बंद असल्याने मंडळाने अगोदरच जून महिन्याचा ५० टक्के पगार कापला आहे. कर्मचाºयांनी २० दिवस सक्तीचा रजेवर जाण्याचा मंडळाचा निर्णय अन्यायकारक आहे.कर्मचारी कामानिमित्त रजा घेता. २० दिवस सक्तीची रजा घेतली, तर आगामी काळात रजा मिळणार नाही. रजा शिल्लक नसल्याने बिनपगारी रजा गणली जाईल.पगार मिळणार नाही ,मग उदरनिर्वाह कसा करावयाचा हा प्रश्न आहे.महामंडळाने सक्तीचा रजेचा निर्णय रद्द करावा अशी मागणी इंटक युनियनचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे यांनी व्यक्त केली आहे.