शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सक्तीच्या रजेचा कर्मचाऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 9:19 PM

दोंडाईचा: एस.टी.महामंडळाच्या निर्णयामुळे आगारातील चालक-वाहकांसह ३०६ कर्मचाऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने प्रवाशी बस वाहतूक बंद केली तर चालक- वाहक यांची हजेरी लावायचा नियम आहे. परंतु कोरोना महासंकटात महामंडळ प्रशासन हे सोयिस्करपणे विसरल्याचे दिसत आहे. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून या आपत्तीत महामंडळाने चालक-वाहकांना सक्तीच्या २० दिवस रजेवर जाण्याचा फतवा जारी केला आहे. दोंडाईचा आगारातील ३०६ कर्मचाºयांना याचा फटका बसणार असणार असल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. हा फतवा मागे घेण्याची मागणी कर्मचाºयांनी केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एस.टी. महामंडळाने मार्च महिन्यापासून प्रवाशी वाहतूक बंद केली आहे. मध्यंतरी वाहतूक पुन्हा सुरू केली. परंतु त्यास अल्पसा प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा प्रवाशी वाहतूक बंद झाली. महामंडळाचे वाढते नुकसान बघता दोंडाईचा आगाराने माल वाहतूक सुरू केलीआहे. दोंडाईचा आगारात ५९ बसेस असून चालक-वाहक २२९ आहेत.चालक-वाहक यांना वषार्तून ४० दिवस रजा घेता येतात. त्यात २० दिवस मंदिच्या दिवसात तर उरलेल्या २० सुट्या गरजेनुसार घेता येतात. नैसर्गिकआपत्ती, संचारबंदी, सार्वजनीक आंदोलन काळात प्रशासनाने वाहतूक बंद केली तर चालक-वाहक यांचा पगार कापू नये,असे प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले होते.कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून यात चालक-वाहक यांना मंदिच्या नावाखाली २० दिवस सक्तीच्या रजेवर पाठविणे, अन्यायकारक असल्याचे चालक-वाहकांसह कर्मचारी यांचे मत आहे. आगारात अगोदरच चालक-वाहक यांची संख्या कमी असून गर्दीच्या काळात गरज असतानाही सुटी मिळत नसल्याची तक्रार आहे. आता गरज नसताना नाहक सक्तीचा रजेवर पाठविले जात असल्याने दोडाईचा सह जिल्यातील चालक-वाहक यांचात असंतोष निर्माण झाला आहे. दोंडाईचा आगारातील ३०६ कर्मचाºयांना याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या अगोदरच महामंडळाने जून महिन्याच्या ५० टक्के पगार कापला आहे.सक्तीचा रजेचा फतवा रद्द करावा,अशी मागणी सर्वच कर्मचाºयांनी महामंडळाकडे केली आहे.अन्यायकारण निर्णय : चत्रेकोरोनामुळे बसेस बंद असल्याने मंडळाने अगोदरच जून महिन्याचा ५० टक्के पगार कापला आहे. कर्मचाºयांनी २० दिवस सक्तीचा रजेवर जाण्याचा मंडळाचा निर्णय अन्यायकारक आहे.कर्मचारी कामानिमित्त रजा घेता. २० दिवस सक्तीची रजा घेतली, तर आगामी काळात रजा मिळणार नाही. रजा शिल्लक नसल्याने बिनपगारी रजा गणली जाईल.पगार मिळणार नाही ,मग उदरनिर्वाह कसा करावयाचा हा प्रश्न आहे.महामंडळाने सक्तीचा रजेचा निर्णय रद्द करावा अशी मागणी इंटक युनियनचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे यांनी व्यक्त केली आहे.