शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कुमार नगरात नागरिक डेंग्यूने धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

धुळे : कोरोना महामारीनंतर आता महानगरात डेंग्यूने ताेंड वर केले आहे. शहरातील विविध भागात आतापर्यंत ६८ रुग्ण आढळून आले ...

धुळे : कोरोना महामारीनंतर आता महानगरात डेंग्यूने ताेंड वर केले आहे. शहरातील विविध भागात आतापर्यंत ६८ रुग्ण आढळून आले आहेत. मनपाकडून धुरळणी व फवारणी नियमित होत नसल्याने नागिरकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साक्रीरोडवरील कुमारनगर भागात दाेन नागरिकांचा आतापर्यंत डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे.

साक्रीरोडवरील कुमार नगर परिसरात डेंग्यू आजार डोके वर काढत आहे. परिसरात खड्डे असल्याने पावसाचे पाणी डबक्यात साचते. त्या भागातील पाण्याचा निचरा होण्याची नितांत गरज असताना पाण्याचा निचरा होत नाही. तर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी गटार साफ करण्यासाठी येतात. मात्र, नागरिकांकडून पैशांची मागणी होते. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यूची साथ वाढत आहे. मनपाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी प्रशांत तनेजा यांनी केली आहे.

खासगी रुग्णालयात उपचार

शहरात महिन्याभरापासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. वातावणातील बदलामुळे डेंग्यू पसरविण्याऱ्या एडिस इजिप्ती डासांचा उद्रेक वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी काही जणांचे अहवाल डेंग्यूचे आढळून आले आहे. शासकीय रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणााऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

अंगदुखी व ताप

कोरोना व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये ताप जास्त प्रमाणात येतो. तसेच अंगदुखीचा त्रास होतो. कोरोनामध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण अधिक असते. डेंग्यूमध्ये मात्र सर्दी, खोकला होत नाही. झालाच तर प्रमाण कमी असते. डेंग्यूमध्ये डोळे दुखतात. कोरोनाच्या काही रुग्णांमध्येही अशी लक्षणे आढळली आहेत. डेंग्यू या आजारात सांधेदुखीचा तीव्र त्रास जाणवतो.

पाणी उकळून प्या

पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे आजार बळावतात. म्हणून पाणी उकळूनच प्यावे. जिल्ह्यातील जलस्रोतांची आरोग्य विभागाने तपासणी केली होती. त्यात १३ गावांतील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले होते. पाणी उकळून प्यावे. त्यामुळे डायरिया, गॅस्ट्रो याप्रकारचे त्रास होत नाहीत.

कोरडा दिवस पाळा

पावसाळ्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असते. तसेच विषाणूतच बदल होतो. विषाणूंचा बदल रोखणे आपल्या हातात नाही. पण परिसर स्वच्छ ठेवल्यास डासांची उत्पत्ती आपण रोखू शकतो. गच्चीवरील टायर, भंगार वस्तू यात पाणी साठू देऊ नये. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.

- डॉ. अनिल पाटील,

जिल्हा हिवताप अधिकारी