शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

२४ तासात २८ वेळा बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:37 AM

रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या खांबावरील वाहिन्या हलत होत्या. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जयशंकर कॉलनीत कचरा ...

रविवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या खांबावरील वाहिन्या हलत होत्या. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जयशंकर कॉलनीत कचरा संकलन करणारी घंटागाडी आल्यानंतर विजय हौसिंग सोसायटीत राहणारी आशाबाई राजेंद्र येवले ही महिला कचरा टाकण्यासाठी आली असता वाऱ्यामुळे विजेची तार तुटली आणि आशाबाई यांच्या अंगावर पडली. वीजप्रवाहामुळे या महिलेला जोरदार धक्का बसला. त्यातच आशाबाई या फेकल्या गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि अशातच त्यांचा मृत्यू झाला. इतर महिलांनी आरडाओरड केली गर्दी जमा झाली होती. आशाबाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

आशाबाई येवले यांचे पती राजेंद्र यांचा पाचकंदील भागात फळविक्रीचा व्यवसाय आहे. सामाजिक कार्यात येवले परिवाराचा सहभाग असतो. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

वीज वितरण कंपनीने काही महिन्यांपूर्वी जयशंकर कॉलनी भागात वीज खांबावरील धोकादायक तारा बदलून केबल टाकली होती. मात्र येवले यांच्या घरासमोरील खांबावरून वीजवाहिन्या काढलेल्या नव्हत्या. रविवारी झालेल्या वाऱ्यामुळे या वाहिन्या मोठ्या प्रमाणात हलत होत्या. अशातच ही दुर्घटना घडल्याने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहरात ठिकठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या असल्याने त्यांच्या जोडणीचे काम सोमवारी सकाळपासून सुरू होते. २४ तासांच्या कालावधीत तब्बल २८ वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा फटका हा सर्वाधिक देवपूर व साक्री रोड भागाला बसला होता.

रविवारी दुपारी अचानक चक्रीवादळामुळे धुळ्यात मोठ्या वादळीवाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. वारा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वीजवाहिन्या तुुटल्या, काही ठिकाणी खांब वाकून गेले आहेत. यात अंदाजे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी काम करीत आहेत. टप्प्याटप्प्याने वीज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न आहेत.

- एल. बी. गांगुर्डे, प्रभारी कार्यकारी अभियंता