शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टोल वसुलीबाबत ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST

अणदूर : अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथील महामार्गावर मात्र टोल वसुली सुरु करण्यात आली ...

अणदूर : अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथील महामार्गावर मात्र टोल वसुली सुरु करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टोल वसुलीविरोधात अणदूर येथे हुतात्मा स्मारक सभागृहामध्ये सोमवारी बैठक घेण्यात आली. यानंतर निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना टोलविरोधी कृती समितीने निवेदनही दिले. फुलवाडी नाक्यापासून उमरग्यापर्यंत रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम अजूनही रखडले आहे. असे असताना टोल वसुली नियमित केली जात आहे. फुलवाडी येथून दोन-तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील वाहनचालकांकडूनही टोल वसुली सुरूच आहे. अणदूर येथे मोठी बाजारपेठ, बँका, शाळा, महाविद्यालय, दवाखाने असल्याने येथील जनतेला दिवसातून अनेकवेळा या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे टोलनाक्याच्या या वसुलीमुळे व्यापारी, शेतकरी, नागरिकांची मोठी कोंडी होत आहे. फुलवाडी, धनगरवाडी, अणदूर येथील ग्रामपंचायतींनी वाहनाला टोल घेऊ नये, असा ठराव मंजूर करून संबंधित टोल नाका अधिकाऱ्यांना दिला. मात्र, त्याला त्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात पंधरा दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे टोलविरोधी कृती समितीने म्हटले आहे. या निवेदनावर रामचंद्र आलुरे, पवन घुगरे, ॲड. दीपक आलुरे, डॉ. जितेंद्र कानडे, बाळकृष्ण घोडके, सिद्राम शेटे, दयानंद मुडके, मलंग शेख, धनराज मुळे, किशोर पुजारी, साहेबराव घुगे, प्रशांत कुलकर्णी, मधुकर बंदपट्टे, नागनाथ मुडके, अनिल मुळे, सिकंदर अंगुले, सचिन ढेपे, विक्रांत दुधाळकर, संजीव गाढवे यांच्या सह्या आहेत.

आमच्या धनगरवाडी गावापासून टोल नाका हा एक किलोमीटर अंतरावर आहे. आम्हाला अणदूरला नेहमी वैयक्तिक कामानिमित्त जावे लागते. त्यामुळे जाताना आणि येतानाही आमच्याकडून टोल वसूल केला जातो, आम्हाला याचा त्रास होत आहे.

- बिरु दुधभाते, माजी सरपंच, धनगरवाडी

अणदूर ते फुलवाडी हे चार किलोमीटर अंतर असून, अणदूरहून शेकडो गाड्या सोलापूरला ये-जा करत असतात. नियमानुसार दहा किलोमीटर अंतरावरील वाहनांना टोलमधून सूट देणे गरजेचे आहे. परंतु, टोलनाका अधिकाऱ्यांकडून ही सूट दिली जात नाही. पुढील १५ दिवसात याबद्दल योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे.

- डाॅ. जितेंद्र कानडे, सदस्य, टोलविरोधी कृती समिती