शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानी तर होतेच, सोयाबीनच्या फडावर आता अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST

कळंब - एकीकडे काढणी होऊन बाजारात विक्रीसाठी आलेले सोयाबीन ‘बेभाव’ होत असतानाच, दुसरीकडे वावरात उभ्या असलेल्या सोयाबीनवर पाऊस कोसळत ...

कळंब - एकीकडे काढणी होऊन बाजारात विक्रीसाठी आलेले सोयाबीन ‘बेभाव’ होत असतानाच, दुसरीकडे वावरात उभ्या असलेल्या सोयाबीनवर पाऊस कोसळत आहे. सुलतानी संकटाचा सामना करत असतानाच, अस्मानी संकटही कोसळत असल्याने तालुक्यात असंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीनचे फड पाण्यात गेले आहेत.

मागच्या पाच वर्षांत वीस हजार हेक्टर क्षेत्र असलेले सोयाबीनचे क्षेत्र यंदा तब्बल साठ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. सोयाबीन क्षेत्रात वेगाने झालेल्या या वृद्धीमुळे सोयाबीन हे तालुक्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक ठरले आहे. यंदा सोयाबीन वावरात जसजसे वाढत होते, तसतसा बाजारात याचा दरही वाढत होता. मागच्या महिन्याभरात तर यात उच्चांकी वृद्धी नोंदली जाऊन, सोयाबीनचा दर ''दसहजारी'' पार करून गेला. यामुळे प्रतिकूल हवामान व अन्य कारणांमुळे उत्पादनात घट झाली तरी, वाढलेला भाव ''मालामाल'' करून जाईल, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काही शेतकऱ्यांची काढणी होऊन, त्यातून हाती आलेला माल मोंढ्यात पोहोचतो न पोहोचतो तोच, भाव घसरण्यास सुरुवात झाली. पुढे आठच दिवसात दहा हजाराच्या आसपास असलेला दर सहा हजाराच्या आसपास येऊन ठेपला. यात सातत्याने घट होत असल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. हे कमी होते की काय, म्हणून मागच्या चार दिवसांपासून पावसाचे ''कमबॅक'' झाले असून हा पाऊसही उरला सुरला सूड उगवत असल्याचे दिसून येत आहे.

चौकट...

९० टक्के सोयाबीन फडात...

साधारणतः जूनच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पेरणी झालेल्या तालुक्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केली होती. यापैकी सध्या केवळ पाच ते दहा टक्के लोकांचा काढणी हंगाम काढणी व मळणी या टप्प्यावर आहे. उर्वरित नव्वद टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन फडात उभे असून शेंगा पक्व झालेले हे पीक आता काढणीस आले आहे.

पिवळ्या सोन्यावर पावसाचे ढग...

सध्या बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक काढणीस आले आहे. यासाठी पावसाने उघडीप देणे गरजेचे आहे. यातच सोमवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यात बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत नुकसानकारक पाऊस पडल्याने अनेकांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. फड पाण्यात आहेत.

तक्ता...

या पावसाचा काय परिणाम...

माल डॅमेज होत आहे.

यामुळे भाव कमी मिळेल

उत्पादनात घट होईल

प्रतवारी कमी होईल

मळणीस अडथळे येतील

राशी भिजल्यावर नुकसान

झाकाझाकी करण्याचा भुर्दंड

बाजारात पडझड सुरूच

कळंब येथील मोंढ्यात चार दिवसात एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोमवारी ६ हजार ९०० असलेला दर गुरुवारी ५ हजार ५०० वर येऊन ठेपला आहे. मोंढ्यातील दरात ही पडझड सुरू असतानाच खेड्यातील फडी लुटीचे अड्डे ठरले जात आहेत.