शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

जिभेचे लाड थांबवा, मसालेदार पदार्थामुळे होऊ शकतो अल्सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : धावपळीच्या युगात अनेक जण वेळेवर जेवणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच काही जण जिभेचे चोचले पुरविण्याकरिता मसालेदार, तिखट ...

उस्मानाबाद : धावपळीच्या युगात अनेक जण वेळेवर जेवणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच काही जण जिभेचे चोचले पुरविण्याकरिता मसालेदार, तिखट पदार्थ खात आहेत. या पदार्थ्यांमुळे पोटाच्या अल्सरचा धोका उद्भवत आहे. त्यामुळे नागरिकांनी तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत, असा तज्ज्ञ डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक व्यक्ती वेळेवर जेवण करीत नाहीत. काही जण जिभेचा लाड पुरविण्याकरिता बाहेर हॉटेलातील चटपटीत व मसालेदार, तिखट पदार्थ खाण्यास पसंती देत आहेत. शिवाय, तळलेल्या पदार्थांकडे अनेकांचा कल वाढला आहे. या पदार्थांमुळे अनेकांना पोटाचा त्रास उद्भवत आहे. पोटाच्या अल्सरचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त तेलकट, मसालेदार व तिखट खाणे टाळावे, असे डॉक्टरांनी सांगितले.

काय आहेत लक्षणे....

पोट दुखणे

उलट्या होणे

भूक मंदावणे

वजनात अचानक घट होणे

उलट्यातून रक्त पडणे

मळमळ होणे

पोटात आग पडणे

उदास वाटणे

काय काळजी घेणार

चटपटीत व लज्जतदार पदार्थ खाण्याचा अनेकांना मोह आवरत नसतो. मात्र, अशा पदार्थांच्या खाण्यामुळे पोटाचे आजार वाढत आहेत.

तिखट, मसालेदार पदार्थांमुळे पोटाचा अल्सर वाढत आहे. ही समस्या सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये आढळून येत आहे. घाईगडबडीचे आयुष्य असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळून यतो.

आरोग्याच्या दृष्टीने तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळणे, व्यसनापासून दूर राहणे, जागरण टाळणे, ध्यानधारणा करण्याने या आजारावर नियंत्रण मिळता येणे शक्य असते.

सकस आहाराबरोबरच नियमित व्यायाम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

पौष्टिक आहाराच महत्त्वाचा

मसालेदार, तिखट पदार्थांमुळे पोटाच्या समस्या उद्भवत आहेत. अवेळी जेवण, व्यसनामुळे या आजाराचा त्रास होतो. हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी पौष्टिक आहार घेणे, ध्यानधारणा करणे, सोबतच सिगारेट, तंबाखूचे व्यसन सोडणे महत्त्वाचे आहे. ओ-पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळून येत आहे.

-डॉ. राज गलांडे, जनरल फिजिशिन

उपाशी राहणे, तिखट, मासलेदार पदार्थांचा अधिक प्रमाणात आहारात समावेश असणे यामुळे अल्सरचा त्रास जाणवू लागतो. आजार टाळण्याकरिता वेळेवर जेवणे, जागरण टाळणे महत्त्वाचे आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना अल्सरचा त्रास जाणवत असतो.

-डॉ. एन. बी. गोसावी, जनरल फिजिशिन