शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची हुलकावणी, पेरणी १० टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : निम्मा जून उलटून गेला तरी जिल्ह्यात सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. परिणामी, पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाला ...

उस्मानाबाद : निम्मा जून उलटून गेला तरी जिल्ह्यात सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. परिणामी, पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाला विलंब होत चालल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे कल वाढवला असून, जिल्ह्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस हा अनियमित होत असतो. शिवाय, कुठे अतिवृष्टी तर कुठे कोरड अशी स्थिती नेहमीचीच आहे. याचा परिणाम पीक बदलात होत चालला आहे. उशिरा पेरणी झाली व कितीही नैसर्गिक संकटे आली तरी सोयाबीन हे किमान खर्च काढून देणारे पीक म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात दरवर्षी नव्याने भर पडत आहे. दरम्यान, यावर्षीही अशीच स्थिती राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पेरणीसाठी सरासरी १०० मिमी पावसाची गरज आहे. मात्र, आतापर्यंत भूम व तुळजापूर वगळता ही सरासरी कोणत्याही तालुक्याने ओलांडली नाही. यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात लागवडीखाली येणारे क्षेत्र ५ लाख ३२ हजार ७३९ हेक्टर्स इतके आहे. यापैकी आजघडीला केवळ ५४ हजार १९५ हेक्टर्स क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाच्या विलंबामुळे उडीद, मूग या पिकांचा पेरा कमी होत चालला आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २ हजार ९१३ हेक्टर्सवर मूग तर ६ हजार ८९९ हेक्टर्सवर उडीदाचा पेरा झाला आहे. अपेक्षित पेरणीच्या तुलनेत हे क्षेत्र १४ टक्के आहे. कृषी विभागाने यावेळी २ लाख ४० हजार हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होईल, असे गृहित धरले आहे. त्या तुलनेत आजघडीला जिल्ह्यात ३६ हजार ६२९ हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. या शिवाय, प्रमुख पीक असलेल्या तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ८८ हजार ७५१ इतके अपेक्षित आहे. तुलनेत पेरणी ही केवळ ४ हजार ८०१ हेक्टर्सवर झाली आहे. पावसाने आणखी ताटकळत ठेवल्यास उडीद, मुगाच्या आशा मावळतील.

कळंब, तुळजापूर मध्ये सर्वाधिक पेरणी...

जिल्ह्यात पेरणीच्या बाबतीत कळंब व तुळजापूर तालुके आघाडीवर आहेत. कळंब तालुक्यात आतापर्यंत १३ हजार २४० तर तुळजापूर तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. उस्मानाबाद ९२०, भूम ५ हजार ३०२, उमरगा ६९०, वाशी ८३१ तर लोहारा तालुक्यात ३ हजार ३०६ हेक्टर्सवर पेरणी झाली. परंड्यात अद्याप पेरण्या सुरु नाहीत.

पावसाची असमानता कायम...

जिल्ह्यात आतापर्यंत असमान पाऊस झाला आहे. भूम तालुक्यात सर्वाधिक १२४ मिमी तर त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यात ११२ मिमी पावसाची नोंद आहे. उस्मानाबाद ६६, परंडा ५९, कळंब ९८, उमरगा ६५, लोहारा ८२ तर वाशी तालुक्यात ९३ मिमी पावसाची नोंद गुरुवारपर्यंत झाली आहे.