शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पारगावात पर्यायी स्मशानभूमीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे मांजरा नदीलगत असलेली स्मशानभूमी नदीला पूर आल्यानंतर पाण्याखाली जाते. अशा वेळी गावात एखाद्या ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे मांजरा नदीलगत असलेली स्मशानभूमी नदीला पूर आल्यानंतर पाण्याखाली जाते. अशा वेळी गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने येथे पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

वाशी तालुक्यातील पारगाव हे उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रवेशद्वार असून, औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरा नदीच्या काठी वसलेले आहे. गावची लोकसंख्या जवळपास सहा हजार असून, ग्रामपंचायत सदस्य संख्या तेरा आहे. येथे एक सार्वजनिक स्मशानभूमी आहे. गावात कोणीही मयत झाल्यास याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र, ही जागा अपुरी असल्यामुळे एकाच दिवशी किंवा सलग दोन दिवशी दोन मृत्यू झाल्यास एका मृतदेहावर स्मशानभूमीच्या बाजूला मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे येथे आणखी एका स्मशानभूमीचे बांधकाम व्हावे, अशी ग्रामस्थांची जुनी मागणी आहे.

दरम्यान, सध्या उपलब्ध असलेली स्मशानभूमी मांजरा नदीकाठी असून, मांजरा नदीला पूर आल्यानंतर ती पाण्याखाली जाते. अशा वेळी गावात अंत्यसंस्कारासाठी कुठलीच पर्यायी जागा उपलब्ध नाही. गावालगत शेतजमीन असलेले लोक त्यांच्या शेतात पत्र्याचे शेड उभारून अंत्यसंस्कार करतात; परंतु ज्यांच्याकडे जागा नाही ते जुन्या डांबरी रस्त्यावरच मांजरा नदीवरील पुलाजवळ तर काही जण गावालगत असलेल्या फॉरेस्टमध्ये अंत्यसंस्कार करतात. त्यामुळे येथे पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

चौकट........

पूर परस्थितीदरम्यान अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची नितांत गरज आहे. मात्र, ही समस्या आजवर कोणी मांडली नव्हती. या समस्येला प्राधान्य देत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सर्व सदस्यांना विचारात घेऊन नवीन स्मशानभूमीसाठी प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल.

- महेश कोळी, सरपंच

सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात एकच स्मशानभूमी असल्याने आधीच अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. मांजरा नदीच्या काठावर असलेली स्मशानभूमी पूर आल्यानंतर पाण्याखाली जाते. अशा वेळी अंत्यसंस्कार करताना मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे आता पुराचे पाणी येणार नाही, अशा ठिकाणी फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी स्मशानभूमी होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पाठपुरावा करू.

- कॉ. पंकज चव्हाण, उपसरपंच