शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीचे टार्गेट पूर्ण करा, नाहीतर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात रीडिंग न घेताच बिले दिल्याच्या कारणावरून बराच गहजब झाला होता. त्यामुळे अनेकांनी बिलेही भरली नाहीत. ...

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात रीडिंग न घेताच बिले दिल्याच्या कारणावरून बराच गहजब झाला होता. त्यामुळे अनेकांनी बिलेही भरली नाहीत. दरम्यान, आता वसुली थांबलेली असल्याने महावितरणच्या तिजोरीतील कॅश फ्लो थांबला आहे. परिणामी, सहव्यवस्थापकीय संचालकांनी कठोर पवित्रा घेतला असून, अभियंत्यांवर वसुलीची जबाबदारी त्यांनी सोपवली आहे. टार्गेट पूर्ण नाही झाल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी बुधवारी काढलेल्या पत्रान्वये दिला आहे.

लॉकडाऊन कालावधीत महावितरणकडून वसुलीला काहीशी ढील देण्यात आली होती. मार्च एंड असला तरी त्यापूर्वी वाढीव बिले दिल्याच्या कारणावरून झालेल्या गोंधळामुळेही वीज बिल वसुली करण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक ग्राहक सोडून कृषी वीज बिलांच्या मागे महावितरण धावत होती. यानंतर मात्र वसुली पूर्णत: थंडावली आहे. त्यामुळे महावितरणच्या तिजोरीत जमा होणारी रक्कम आटली आहे. औरंगाबाद प्रादेशिक विभागात अधिक थकबाकी असल्याने महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनीही वेळोवेळी या विभागाला फटकारले आहे. यामुळे औरंगाबादचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी आता अभियंत्यांनाच जबाबदारी निश्चित करून दिली आहे. मुख्य कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याला देण्यात येणारे टार्गेट हे पूर्णच झाले पाहिजे, अन्यथा संबंधित अभियंत्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. मंगेश गोंदावले यांनी बुधवारी काढलेल्या पत्रान्वये दिला आहे.

कोणावर कशी आहे जबाबदारी...

२५ हजार रुपयांपर्यंत थकीत वीज बिल वसुलीची जबाबदारी ही शाखा अभियंत्यांवर असणार आहे. २५ ते ५० हजार रुपयांदरम्यानची थकबाकी ही उपविभागीय अभियंत्यांना वसूल करावयाची आहे. ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत असलेली थकबाकी ही कार्यकारी अभियंत्यांना वसूल करावी लागणार आहे. १ ते ५ लाख रुपयांपर्यंत अधीक्षक अभियंता तर ५ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असेल तरी मुख्य अभियंत्यांनाच वसुलीत लक्ष घालावे लागणार आहे.

आताही लाईनमनवरच ढकलणार का...

महावितरणमध्ये तांत्रिक जबाबदारीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या लाईनमनवरच वसुलीचा भार टाकण्याची प्रथा पडली आहे. अभियंत्यांचा टार्गेटचा भार ही लाईनमन मंडळीच वाहून नेत आहे. त्यात कमी पडले की लाईनमनवरच कारवाई केली जाते. त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्नही घडतो. मात्र, आता सहव्यवस्थापकीय संचालकांनी अभियंत्यांचीच जबाबदारी निश्चित करून दिली आहे. तेव्हा हे अभियंते वसुलीसाठी बाहेर पडणार की पुन्हा लाईनमनच्या खांद्यावर बंदुका ठेवणार, याकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा आहेत.