शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, धन कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:34 IST

निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी ३९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या. १५ जानेवारी रोजी ...

निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी ३९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या. १५ जानेवारी रोजी उस्मानाबाद तालुक्यातील ६३, तुळजापूर तालुक्यातील ४८, उमरगा ३८, लोहारा २१, कळंब तालुका ५३, वाशी ३३, भूम ६१, परंडा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली.

ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळित पार पडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी मिळून ७ हजार ३१ जणांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूकही होऊन दोन महिने झाले तरी निवडणुकीत सेवा बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्याप मानधन मिळाले नाही.

जिल्ह्यात निवडणूका झालेल्या ३८२

ग्रापंचायती

४००

निवडणुकीत कर्तव्य बाजावलेले अधिकारी

६६३१

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले कर्मचारी

चौकट..

पहिल्या टप्प्यात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी निवडणुकीच्या खर्चातच गेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सेवा बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधनासाठी निधी अद्याप प्राप्त झाला नसून, निधीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला जात आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तालुकानिहाय आढावा

तालुका ग्रामपंचायती अधिकारी कर्मचारी

उस्मानाबाद ६६ १२२४

तुळजापूर ५३ ९५४

उमरगा ४९ ९४६

लोहारा २६ ४१६

कळंब ५९ ९३८

भूम ७१ ९४५

परंडा ७० १०७०

वाशी ३४ ५४८