शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत पावणेसातशे जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

उस्मानाबाद -एकीकडे कामाची व्याप्ती वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचे भिजत घाेंगडे कायम आहे. जिल्हा परिषदेच्या ...

उस्मानाबाद -एकीकडे कामाची व्याप्ती वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचे भिजत घाेंगडे कायम आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत सुमारे ७ हजार ६४७ जागा मंजूर आहेत. यापैकी एक-दाेन नव्हे तर तब्बल पावणेसातशे जागा रिक्त आहेत. त्यामुळे आजघडीला केवळ ६ हजार ९९३ अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच प्रशासनाचा गाडा हाकावा लागत आहे. परिणामी एकेका कर्मचाऱ्यांकडे दाेन-दाेन टेबलांचा कार्यभार साेपवावा लागत आहे. यातूनच ‘प्रभारीराज’ जाेमात असल्याचे पहावयास मिळते.

काेराेनाचे सकंट आल्यापासून जिल्हा परिषदेतील जवळपास सर्वच विभागांची कामाची व्याप्ती वाढली आहे. सर्वाधिक ताण आराेग्य यंत्रणेवर आला आहे. असे असतानाच दुसरीकडे संबंधित विभागांना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न भेडसावू लागला आहे. यातूनच प्रत्येक विभागात सध्या प्रभारीराज जाेमात सुरू झाले. परिणामी आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांसाठी सरळसेवेने वर्ग-१ ची ९८ जागा मंजूर आहेत. आजघडीला यातील ३७ जागा रिक्त आहेत. सध्या केवळ ६१ अधिकाऱ्यांना प्रशासनाचा गाडा हाकावा लागत आहे. अशीच अवस्था वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत आहे. २०२ जागा मंजूर आहेत. यापैकी १२६ जण कार्यरत आहेत. उर्वरित ७६ ठिकाणी नियमित अधिकारी नाही. गट ‘क’ व गट ‘ड’च्या रिक्त जागांचा तर विचार न केलेलाच बरा. विविध विभागांसाठी ७ हजार ३७४ जागा मंजूर आहेत. यापैकी ५६८ जागा रिक्त आहेत. तर उर्वरित ६ हजार ८०६ जागा भरलेल्या आहेत. रिक्त जागा भरल्या जाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेकडून वेळाेवेळी शासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, काही वर्षांपासून हे भिजत घाेंगडे कायम आहे. दरम्यान, ही बाब समाेर आल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. साेबत रिक्त जागांचा अहवालही जाेडला आहे. कामाची वाढती व्याप्ती लक्षात घेत, रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

काेट...

जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांतर्गत अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या सुमारे ६८१ जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज प्रभावित हाेत आहे. हा प्रश्न समाेर आल्यानंतर रिक्त जागा भरण्याच्या मागणीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. या जागा भरल्यास प्रशासनावरील ताण कमी हाेऊन कामकाज गतिमान हाेईल. उपराेक्त मागणीसाठी यापुढेही जिल्हा परिषदेचा पाठपुरावा सुरूच राहील

-अस्मिता कांबळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद.