शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

दररोज १०० ते १५० जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : शिवभोजन थाळीसाठी दररोज रांगेत उभे राहूनही कोटा संपल्याने नागरिकांना दररोज १०० ते १५० जणांना उपाशीपोटीच परत जावे ...

उस्मानाबाद : शिवभोजन थाळीसाठी दररोज रांगेत उभे राहूनही कोटा संपल्याने नागरिकांना दररोज १०० ते १५० जणांना उपाशीपोटीच परत जावे लागत असल्याचे चित्र दिसून आले.

गरीब व गरजूंना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता २६ जानेवारी २०२० पासून राज्यभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. जिल्ह्यात प्रथम प्रायोगिक तत्त्वावर तीन केंद्र सुरू करण्यात आले. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता केंद्राची संख्या वाढविण्यात आली. सध्या जिल्ह्यात केंद्राची संख्या १५ इतकी झाली आहे. कोरोनाकाळात शेतमजूर, गरजूंना थाळीचा आधार मिळत आहे. केंद्रास निश्चित केलेल्या थाळीची संख्या १५ एप्रिलपासून दीडपट वाढविण्यात आली आहे. त्यासोबतच वेळही वाढविण्यात आला आहे. सकाळी ११ दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांना थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, दुपारी २ वाजेपर्यंतच कोटा संपत असल्याने १०० ते १५० नागरिकांना रिकाम्या हाताने परवावे लागत आहे.

पॉइंटर...

जिल्ह्यातील एकूण शिवभाजन केंद्र १५

रोजच्या थाळी लाभार्थींची संख्या २२८५

शहरातील एकूण शिवभाेजन केंद्र ७

शहरातील रोज लाभार्थींची संख्या १२००

रोज १०० ते दीडशे जण उपाशी

बसस्थानक केंद्र : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील कॅन्टिगमधील शिवभोजन थाळी केंद्रात १०० थाळीचे उद्दिष्ट आहे. १५ एप्रिलपासून इष्टांक वाढविण्यात आला त्यामुळे थाळींची संख्या १५० करण्यात आली आहे. असे असले तरी दुपारी १.३० वाजेपर्यंत थाळी संपत असल्याने दररोज १०० ते १५० व्यक्तींना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

जिल्हा रुग्णालय परिसर केंद्र : जिल्हा रुग्णालय परिसरात शिवभाेजन केंद्र आहे. या केंद्राला १०० लाभार्थींचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. सध्या इष्टांक वाढविण्यात आला असल्याने १५० थाळ्या झाल्या आहेत. या केंद्रावरही दुपारी २ वाजेनंतर थाळी संपत आहेत.

दरोज दोन हजार २८५ जणांचे भरते पोट, बाकीच्याचे काय?

जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी १२ शिवभोजन थाळी केंद्र होती. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता तीन केंद्र वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे आता केंद्रांची संख्या १५ झाली आहे. या सर्वच केंद्रांवर दररोज दोन हजार २८५ जणांचे पोट भरत आहे. मात्र इतर व्यक्तींना वंचित राहावे लागत आहे.