शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाे, थेट कृषी सहायकांकडे द्या मागणी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : खरीप-२०२० मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे प्रचंड नुकसान होऊनदेखील ८० टक्के शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. राज्य ...

उस्मानाबाद : खरीप-२०२० मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे प्रचंड नुकसान होऊनदेखील ८० टक्के शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. राज्य सरकारने नुकसान झाल्याचे मान्य करीत अनुदान दिले; परंतु विमा भरपाईबाबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करूनदेखील उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. आता न्यायालयीन लढाईचा एक भाग म्हणून अनुदान मिळालेल्या, परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या परिसराच्या कृषी सहायकांकडे मागणी अर्ज देण्याचे आवाहन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

पिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने २०१९ मध्ये फडणवीस सरकारने जशी सरसकट नुकसान भरपाई दिली, त्याप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई दिली जाईल, अशी चर्चा असल्याने शेतकऱ्यांनी तेव्हा नुकसानभरपाईचा वेगळा अर्ज केला नव्हता. परंतु, शासकीय यंत्रणेला नुकसान झाल्याचे कळविले होते. एवढेच नाही तर प्रत्येक गावात जाऊन शासकीय यंत्रणेने नुकसानीची पाहणीदेखील केली होती. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यात आले, याचा अर्थ या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. हे राज्य सरकारने मान्य केले आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची प्रक्रिया राज्य सरकारच्या कृषी आयुक्तांच्या माध्यमातून होते. निविदा काढून विमा कंपनी ठरविणे व करार करण्याची जबाबदारी ही कृषी आयुक्तांची आहे. म्हणजे पीक विम्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारची जबाबदारी सुनिश्चित आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठीचा लेखी अर्ज ७२ तासांत दिला नसल्याचे कारण देत विमा नाकारला. त्यामुळे नुकसान हाेऊनही सुमारे ३ लाख ८१ हजार ५८४ शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी शासनाची आहे. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊनही २०१९ प्रमाणे आजवर भरपाई मिळू शकली नाही. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आता न्यायालयीन लढाई...

राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही आजवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे पीक विम्याप्रश्नी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुदान मिळालेल्या, परंतु नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या भागातील कृषी सहायकांकडे मागणी अर्ज सादर करावेत. त्याची रीतसर पाेहोच घ्यावी, असे आवाहन भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.