शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा चटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
3
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
4
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
5
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
6
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
7
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
8
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
9
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
10
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
11
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
12
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
13
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
15
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
16
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
17
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
18
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
19
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
20
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्यांअभावी पालिकेच्या कामकाजाची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

उमरगा : येथील मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे मागील सात-आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला ...

उमरगा : येथील मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे मागील सात-आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. यामुळे ते सध्या उस्मानाबादेत मुक्कामी असून, आठवड्यातील एखादा दिवस येथे हजेरी लावतात. त्यामुळे पालिकेतील कामकाजाची घडी विस्कटली असून, अनेक कामे खोळंबून राहत असल्याचे दिसत आहे.

मुबलक पाणी असतानाही सध्या शहरात पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दररोज एखाद्या वाॅर्डातील नागरिक, महिला पालिकेत धरणे देतात वा घेराव घालत असताना यावर कसलाच तोडगा निघत नाही. स्वच्छता, घरकुल, तसेच विविध योजनांची अंमलबजावणी, बांधकाम परवाने, विकासकामे याकडेदेखील पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. साथीच्या आजाराने कहर केला आहे. घरकुल योजनेची अंमलबजावणी, बांधकाम परवानगी, विकासकामे व त्यांचे नियोजन, विविध कामांची देयके, करवसुली, विविध योजनेंतर्गत येणाऱ्या विकास निधींचा वापर करण्याबाबतच्या सूचना, परवानग्या ही कामे मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीविना खोळंबून राहत आहेत. उमरगा हे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक आहे. एवढ्या महत्त्वाच्या पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना आठ-नऊ महिने इतरत्र प्रभारी नियुक्ती का दिली जाते, असा प्रश्न आता शहरवासीयांतून उपस्थित होत आहे.

कोट.........

मुबलक पाणीसाठा असतानाही गळतीमुळे शहराला पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या वर्षभरात मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, तसेच नवीन नियोजित पाणीपुरवठा योजनेला कार्यान्वित करण्यासाठीही फारशी उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळेच शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र बनत आहे. आमच्या प्रभाग-९ मध्ये पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे. मुख्याधिकारीच नसल्याने समस्या मांडायच्या कुणासमोर, असा प्रश्न आहे.

-दत्तू रोंगे, सामाजिक कार्यकर्ते

कोट.........

उमरगा पालिकेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी असूनही ते कायम गैरहजर असतात. आठवड्यातून एखादा दिवसच हजर राहत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाला त्यांना येथे कामच करू द्यायचे नव्हते, तर येथे नियुक्ती दिली कशासाठी, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. येथे नवीन मुख्याधिकारी नियुक्त करून नागरिकांची अडचण दूर करावी, अशी आमची मागणी आहे.

-संजय पवार, गटनेते, राष्ट्रवादी