शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

By मोरेश्वर येरम | Published: January 17, 2021 1:47 PM

"औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले. 

ठळक मुद्देनामांतराच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांचं महत्वाचं विधानराजेश टोपे यांनी दिलं संजय राऊत यांना प्रत्युत्तरनामांतरापेक्षा शहराचा विकास महत्वाचा असल्याचं केलं वक्तव्य

राज्यात सध्या शहरांच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. याच मुद्द्यावरुन आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सेक्युलरवादावर जोरदार टीका केली. आता नामांतरणाच्या मुद्द्यावरुन राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी नामांतरापेक्षा त्या शहराचा विकास होणं महत्वाचं असल्याचं टोपे म्हणाले. 

राजेश टोपे आज उस्मानाबादमध्ये एका रुग्णालयाच्या उदघाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले. 

जनतेची इच्छा समजून घेऊ मग निर्णयशहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांनी तेथील जनतेची इच्छा समजून घेणं महत्वाचं असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडी ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आली आहे. तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीनं याबाबतचा निर्णय घेतला तर कोणतीही अडचण येणार नाही. मुळात नामांतराआधी त्या शहरातील जनतेची इच्छा समजून घेतली पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले. 

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त आज संजय राऊत यांच्या 'रोखठोक' या सदरातून काँग्रेसच्या सेक्यूलरवादावर जोरदार टीका करण्यात आली आहे. "औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून दंडवत! हे वागणं सेक्यूलर नव्हे!", अशा शब्दांत 'रोखठोक'मधून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे.'रोखठोक'मधील या टीकेबाबत राजेश टोपे यांना विचारण्यात आलं असता वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे. त्यांना लिहू द्या, काही अडचण नाही, असं उत्तर टोपे यांनी दिलं.

नामांतराच्या वादावरुन सरकारमध्ये ठिणगीऔरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. शिवसेनेकडून वारंवार औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला जात असून महाविकास आघाडी सरकार याबाबतचा लवकरच प्रस्ताव आणणार असल्याचंही सांगितलं जात आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराला स्पष्ट विरोध केला आहे. शहरांच्या नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमात नाही. शहरांच्या नामांतराने तेथील तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत का? शहराचा विकास होणार आहे का? असा सवाल उपस्थित करत थोरात यांनी याआधीच शिवसेनेच्या भूमिकेला विरोध केला आहे.  

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषद