शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपास बँका उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

अजीत चंदनशिवे तुळजापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासगी सावकार, उसनवारी करून खरिपाच्या पेरण्या उरकल्या, तरीही बँकांकडून अद्याप कर्ज वाटपाला गती ...

अजीत चंदनशिवे

तुळजापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासगी सावकार, उसनवारी करून खरिपाच्या पेरण्या उरकल्या, तरीही बँकांकडून अद्याप कर्ज वाटपाला गती मिळाली नसल्याचे दिसत आहे. आजवर राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती अशा एकूण १७ बँकानी दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३९ टक्के कर्जाचे वितरण केले असून, या माध्यमातून जवळपास दहा हजार ६७२ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाखांचे वितरण करण्यात आले आहे. कर्जाची मागणी केलेल्या २९१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव अजूनही बँकाकडे प्रलंबित आहेत.

कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ, अशा निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणाचा फटकाही नेहमीच सहन करावा लागतो. गतवर्षी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासूनही बहुतांशी शेतकरी वंचित राहिले, शिवाय दीड वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

दरम्यान, यंदा पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. यामुळे खासगी सावकार, उसनवारी करून खरिपाच्या पेरण्या केल्या, परंतु बॅंकाकडून मात्र पेरणी कालावधीत पीककर्ज मिळाले नसल्याचे बँकाकडून कर्ज वाटप केलेल्या उद्दिष्टाच्या टक्केवारी वरून दिसून येत आहे. तुळजापूर शहरासह तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४ शाखा, बँक ऑफ महाराष्ट्राच्या २, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ६, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय, ॲक्सिस, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा एकूण १७ बँकांना खरीप हंगामासाठी २३५ कोटी ७९ लाख एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. एप्रिलपासून तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना या बँकेमार्फत पीककर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत या बँकांनी उद्दिष्टाच्या तुलनेत २३ जुलैपर्यंत तालुक्यातील १० हजार २६३ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ही टक्केवारी ३९ इतकी आहे. त्यामुळे बँकांच्या अहवालानुसार, २८४ शेतकरी अजूनही पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

चौकट.......

असे झाले कर्ज वाटप...

सहायक निबंधक कार्यालयाकडून २३ जुलैअखेर प्राप्त झालेल्या अहवालानुसार, तुळजापूर शहरासह तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच शाखांनी ७७ कोटी ९८ लाख उद्दिष्टापैकी २ हजार ३७५ शेतकऱ्यांना ७७ कोटी ९८ लाख रुपये एवढे पीककर्ज वितरण केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या दोन शाखांनी ४९ कोटी ५० लाख एवढ्या उद्दिष्टापैकी ९०९ शेतकऱ्यांना १० कोटी ४२ लाख पीककर्ज वितरण केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सहा शाखांना ४२ कोटी ७ लाख एवढे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. त्यांनी २२ कोटी ८५ लाख एवढे पीककर्ज २ हजार १० शेतकऱ्यांना वितरण केले आहे, तर आयडीबीआय बँकेला १० कोटी १३ लाख एवढे उद्दिष्ट दिले होते, त्यापैकी त्यांनी २१० शेतकऱ्यांना २ कोटी ७९ लाख पीककर्ज वाटप केले आहे. आयसीआयसीआय बँकेने १२ कोटी ८९ लाख एवढे उद्दिष्ट होते. त्यापैकी १२५ शेतकऱ्यांना ३ कोटी १० लाख एवढे पीककर्ज वाटप केले आहे. ॲक्सिस बँकेने ५ कोटी ७० लाख उद्दिष्टापैकी ७५ शेतकऱ्यांना १ कोटी ४४ लाख एवढे कर्ज वाटप केले असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेने २८ कोटी ५२ लाख उद्दिष्टापैकी ४ हजार ९७४ शेतकऱ्यांना २० कोटी ९७ लाख पीककर्जाचे वितरण केले आहे.