स्वप्नांचा चुराडा अन् ३ महिन्यातच पतीची हत्या; जेवणानंतरची 'ती' एक सवय ठरली जीवघेणी, पत्नीचा प्रियकरासह रक्तरंजित खेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:22 IST2026-02-05T10:52:39+5:302026-02-05T11:22:42+5:30
राजा रघुवंशी हत्याकांडाप्रमाणेच राजस्थानातही एका नवविवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली.

स्वप्नांचा चुराडा अन् ३ महिन्यातच पतीची हत्या; जेवणानंतरची 'ती' एक सवय ठरली जीवघेणी, पत्नीचा प्रियकरासह रक्तरंजित खेळ
Rajasthan Honeymoon Murder Case: राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातून नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इंदौरमधील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाप्रमाणेच राजस्थानातही एका नवविवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. हा केवळ खून नसून, त्याला लुटमारीसह हिट अँड रनचे रूप देण्याचा प्रयत्न पत्नीने केला होताय मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर या हनीमून मर्डरचा पर्दाफाश केला आहे.
३० जानेवारी २०२६ च्या रात्री ९ वाजेच्या सुमारास रावला पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशीष आणि त्याची पत्नी अंजू हे दोघे रक्ताळलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळले. आशीषला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी पत्नी अंजूने पोलिसांना सांगितले की, एका अज्ञात वाहनाने आम्हाला धडक दिली आणि माझे सोन्याचे दागिने लुटून नेले."
अपघात की हत्या? पोलिसांना आला संशय
श्रीगंगानगरच्या पोलीस अधीक्षक डॉ. अमृता दुहन यांनी सांगितले की, सुरुवातीपासूनच अंजूच्या वागण्यावर पोलिसांना संशय होता. अपघातात पतीचा मृत्यू झाला असताना, शेजारीच असलेल्या पत्नीला साधे खरचटलेही नव्हते. तसेच, मेडिकल रिपोर्टमध्ये आशीषच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आणि गळा आवळल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. फॉरेन्सिक टीमच्या तपासणीत हा अपघात नसल्याचे सिद्ध झाले.
अंजू आणि संजूची जुनी प्रेमकाहानी
तपासात, २३ वर्षीय अंजूचे लग्नापूर्वी सादुलशहर येथील संजू नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. ३ महिन्यांपूर्वी तिचे लग्न आशीषशी झाले. आशीष आपल्या सुंदर पत्नीसोबत भविष्याची स्वप्ने पाहत होता, पण अंजूला आशीषसोबत राहणे मान्य नव्हते. तिने आपल्या माहेरी गेल्यावर संजू आणि त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून आशीषला कायमचे संपवण्याचा कट रचला.
जेवणानंतरची सवय अन् मफलरने आवळला गळा
अंजूला ठाऊक होते की आशीष रोज रात्री जेवणानंतर चालायला जातो. आशीषचा संशय येऊ नये म्हणून अंजू गेल्या काही दिवसांपासून त्याच्यासोबत फिरायला जाऊ लागली होती. ३१ जानेवारीच्या रात्री अंजू आशीषला मुद्दाम एका निर्जन रस्त्यावर घेऊन गेली. तिथे आधीच झुडपात लपून बसलेला संजू आणि त्याचे साथीदार रॉकी व बादल यांनी आशीषवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. आशीष बेशुद्ध पडल्यावर खात्री करण्यासाठी त्यांनी मफलरने त्याचा गळा आवळला. हा गुन्हा लूटमारीचा वाटावा म्हणून अंजूने स्वतःचे झुमके आणि आशीषचा मोबाईल संजूकडे सोपवला.
चारही आरोपी गजाआड
पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे मुख्य आरोपी पत्नी अंजू, तिचा प्रियकर संजू, रोहित उर्फ रॉकी आणि सिद्धार्थ उर्फ बादल या चौघांनाही अटक केली आहे. सुरुवातीला अंजू वारंवार आपला जबाब बदलत होती, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला.