शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... वडिलांनीच पोटच्या तीन लहान मुलींना नदीत फेकून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 16:46 IST

सर्फराज यांनी आपल्या सना (७), सबा (४) आणि शमा (२) या तिन्ही मुलींना घागरा नदीच्या बिरहर घाटावर आणले, त्यानंतर तिन्ही मुलींना एक-एक करत नदीत फेकून दिले

लखनौ - उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर जिल्ह्यातील धनघटा येथे घरगुती वादातून चक्क वडिलांनी आपल्या मुलींना जीव घेतला आहे. माथेफिरू पित्याने पोटच्या तीन मुलींना घागरी नदीत फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत, पोलीस अधीक्षक बृजेशसिंह यांनी सांगितले की, सर्फराज नावाच्या व्यक्तीने आपले मित्र नीरज यांच्या मदतीने दुचाकीवरुन आपल्या मुलींना घागरा नदीकिनारी पोहोचवले. त्यानंतर, तिन्ही मुलींना नदीत फेकून दिले. 

सर्फराज यांनी आपल्या सना (७), सबा (४) आणि शमा (२) या तिन्ही मुलींना घागरा नदीच्या बिरहर घाटावर आणले, त्यानंतर तिन्ही मुलींना एक-एक करत नदीत फेकून दिले. त्यावेळी, जवळील काही स्थानिक ग्रामस्थांनी मुलींना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, या सर्वांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नाविकांच्या मदतीने मुलींचा शोध सुरु केला आहे. मात्र, अद्याप एकही मुलगी सापडली नाही. याप्रकरणी पोलिसांनी सर्फराज आणि त्याचा मित्र नीरज यास ताब्यात घेतलं आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत असलेला सर्फराज २० दिवसांपूर्वीच गावी उत्तर प्रदेशात आला होता. सर्फराजला दारुचे व्यसन होते, त्यातून घरगुती वाद निर्माण होत. याप्रकरणातही घरगुती वाद असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांचा तपास सुरु आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसriverनदीUttar Pradeshउत्तर प्रदेश