शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राज्यातील एसीबीच्या कारवाईचा नीचांकी आलेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 20:43 IST

पाच वर्षांत सापळे झाले खिळखिळे : गुन्ह्यांची संख्या १३१६ वरून ७२७ वर

ठळक मुद्दे२०१४ मध्ये राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कमालीचा फार्मात होता.२०१४ या वर्षभरात लाचेची मागणी करणाऱ्या १२४५ लोकसेवकांविरुद्ध सापळे लावण्यात आले.

नरेश डोंगरे नागपूर - राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा आलेख गेल्या पाच वर्षांपासून सारखा घसरतो आहे. २०१४ मध्ये एसीबीने राज्यात एकूण १३१६ प्रकरणे नोंदवली होती. ऑक्टोबर २०१९ पर्यंत ही संख्या ७२६ वर आली आहे. जागो जागी हस्तक्षेप अन् एसीबीतील अधिकाऱ्यांमध्ये आलेला सुस्तपणा हे दोन प्रमुख कारणं एसीबीच्या घसरगुंडीमागे असल्याचे सांगितले जाते.

खाबुगिरीसाठी चटावलेली मंडळी गरजूंना विनाकारण त्रास देऊन त्यांची काम अडवून धरतात. चिरीमिरी घेतल्यानंतरच कामं करण्याचे तंत्र भ्रष्ट लोकसेवकांनी अंगिकारल्याने सर्वसामान्यांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे यातून भ्रष्ट मंडळी प्रचंड मालमत्ता जमवितात. अशा भ्रष्टाचाऱ्यांना वठणीवर आणण्याची मुख्य जबाबदारी एसीबीकडे आहे.

२०१४ मध्ये राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कमालीचा फार्मात होता. त्यावेळी एसीबीचे महासंचालक म्हणून प्रवीण दीक्षित यांच्याकडे कारभार होता. त्यांनी एसीबीतील प्रत्येक युनिटला कारवाईचे टार्गेटच दिले होते. त्याचमुळे की काय २०१४ या वर्षभरात लाचेची मागणी करणाऱ्या १२४५ लोकसेवकांविरुद्ध सापळे लावण्यात आले. अपसंपदेचे ३५ आणि भ्रष्टाचाराची आणखी २३ प्रकरणे नोंदविण्यात आली. अशा प्रकारे २०१४ मध्ये एसीबीने राज्यभरात एकूण १३१६ प्रकरणे नोंदवली. ही गेल्या १० वर्षांतील सर्वात मोठी कारवाई ठरली. त्यानंतर २०१५ मध्ये लाचखोरीची १२३४ प्रकरणे, अपसंपदेची ३५ तर अन्य १० अशी एकूण १२७९ प्रकरणे एसीबीने हाताळली. २०१६ मध्ये कारवाईचा आलेख घसरला. लाचेची ९८५, अपसंपदेची १७ आणि भ्रष्टाचाराची १४ (एकूण १०१६), २०१७ मध्ये  लाचेची ८७५, अपसंपदेची २२ आणि भ्रष्टाचाराची   २८ (एकूण ९२५) तर २०१८ मध्ये लाचेची ८९१, अपसंपदेची २३ अशी एकूण ९३६ प्रकरणे नोंदवण्यात आली. यावर्षी हा आकडा पुन्हा घसरला आहे.  ऑक्टोबर २०१९ पर्यंत राज्यात एसीबीने ७०९ सापळे लावून भ्रष्ट लोकसेवकांना अडकवले. १८ जणांवर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी (अपसंपदा) गुन्हे दाखल केले. तर भ्रष्टाचाराची चार अन्य प्रकरणे नोंदवण्यात आली.  या आकडेवारीतून एसीबीची घसरगुंडी अधोरेखित व्हावी.

सूचक मौन !अशा प्रकारे गेल्या पाच वर्षांतील एसीबीच्या कारवाईचा आलेख तपासल्यास राज्यातील एसीबीची घसरण अधोरेखित होते. २०१४ मध्ये १३१६ गुन्हे, कारवाई करणारी एसीबी २०१९ मध्ये ७५० वर पोहचल्याचे दिसून येते. या संबंधाने एसीबीचे कोणतेही वरिष्ठ अधिकारी बोलायला तयार नाहीत. मात्र, अनेक ठिकाणच्या कारवाईत झालेला हस्तक्षेप त्यातून काही अधिकाऱ्यांना झालेला मनस्ताप आणि त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आलेला सुस्तपणा या घसरत्या आलेखाला जबाबदार असल्याची कुजबुज ऐकायला मिळते. सिंचन भ्रष्टाचाराच्या १० प्रकरणाच्या फाईल बंद घडामोडीमुळे या विभागाचे सूचक मौन बरेच काही सांगून गेले आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसArrestअटक