शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

आई बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता म्हणून काकाचं कुटुंब संपवून टाकलं; खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:09 IST

४ नोव्हेंबरच्या रात्री राजेंद्र गुप्ताची हत्या झाली, त्यानंतर घरातील त्यांची पत्नी नीतू, मुलगा नवनेंद्र, शुभेंद्र आणि मुलगी गौरांगीलाही गोळी मारून ठार केले.

वाराणसीच्या भेलुपूर येथे ३ महिन्यापूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील ५ लोकांच्या हत्येतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेपासून यातील मुख्य आरोपी विशाल गुप्ता फरार होता. पोलिसांनी विशालला त्याचा भाऊ प्रशांतसह अटक केली आहे. हे दोघे भाऊ सीरगोवर्धनच्या लौटूबीर मंदिराजवळ उभे राहून एकमेकांशी बोलत होते. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या. या दोन्ही भावांनी आई वडील आणि आजोबाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नियोजनपूर्वक त्यांचे चुलते राजेंद्र गुप्ता आणि संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.

आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितले की, १९९७ मध्ये आमच्या आई वडिलांची आणि आजोबांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या काका राजेंद्र गुप्ता यांच्या सांगण्यावरूनच झाली होती. या घटनेनंतर आम्ही दोघे भाऊ नोकरासारखं राजेंद्र गुप्ताच्या घरात राहायचो. २ वर्षापूर्वी राजेंद्र आणि त्यांच्या मुलाने आम्हाला बेदम मारलं होते. अनेक दिवस खोलीत बंद करून ठेवले. त्याचवेळी राजेंद्र गुप्ता आणि त्याच्या कुटुंबाला कायमचं संपवायचं असं विशालने ठरवलं. 

या हत्येसाठी विशालनं बिहारमधून हत्यार आणि मोबाईल सिम कार्ड खरेदी केले. त्यानंतर संधी मिळताच ३ महिन्यापूर्वी राजेंद्र गुप्ताची आणि कुटुंबाची हत्या केली. ४ नोव्हेंबरच्या रात्री राजेंद्र गुप्ताची हत्या झाली, त्यानंतर घरातील त्यांची पत्नी नीतू, मुलगा नवनेंद्र, शुभेंद्र आणि मुलगी गौरांगीलाही गोळी मारून ठार केले. हत्येनंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला. त्यानंतर मुगलसराय स्टेशनला पोहचले तिथून पटना, त्यानंतर कोलकाता आणि मुंबई फिरून पुन्हा बनारसला परतले होते. पोलिसांच्या भीतीने आरोपी कधी हॉटेलला थांबले नाहीत, कधी रात्री ते स्टेशनवरच झोपायचे. 

काकाशी बदला मग कुटुंबाला का संपवलं?

पोलिसांनी आरोपीला काकाशी बदला घ्यायचा होता मग काकी आणि भाऊ बहि‍णींना का मारले असा प्रश्न केला. तेव्हा काकी आणि बहिणी काकाला आणि भावाला भडकवायच्या. सुरुवातीपासून ते लोक मला आणि माझ्या भावाला मारहाण करायचे. हळू हळू सर्वकाही ठीक होईल या विचाराने आम्ही गप्प बसायचो. परंतु ते आम्हाला संपवायलाच निघाले होते. अनेकदा आम्हाला गोळी मारून ठार करू अशा धमक्या दिल्या जायच्या असं आरोपींनी चौकशीत सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी