शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 20:55 IST

एका महिलेने आणि तिच्या मुलीने त्यांच्या बॉयफ्रेंडसह पतीची हत्या केली.

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका महिलेने आणि तिच्या मुलीने त्यांच्या बॉयफ्रेंडसह पतीची हत्या केली. ही घटना २३ जून रोजी घडली, जेव्हा शेतकरी सुभाषची शेतात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी केलेली सखोल चौकशी आणि कॉल डिटेल तपासानंतर १४ दिवसांनी या घटनेचा पर्दाफाश झाला आहे.

तपासात असं दिसून आलं की, सुभाषची मोठी मुलगी डॉली हिने काही महिन्यांपूर्वी स्वतःच्या मर्जीने एका तरुणाशी लग्न केलं होतं. आता त्याची पत्नी कविता हिचे देखील त्याच गावातील गुलजार या व्यक्तीशी संबंध होते. तसेच मुलगी सोनम हिचे मेरठमधील विपिन या तरुणाशी प्रेमसंबंध होते. सुभाषचा दोघींनाही कंटाळा आला होता. आई आणि मुलीला त्यांच्या बॉयफ्रेंडशी लग्न करायचं होतं, परंतु सुभाष त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होता. म्हणूनच त्यांनी त्याला मारण्याचा कट रचला.

मुलगी सोनमला जेव्हा आईच्या प्रेमसंबंधांबद्दल कळलं तेव्हा तिने तिच्या आईला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिने धमकी दिली की, जर तिचं लग्न विपिनशी झालं नाही तर ती तिच्या आईच्या प्रेमाबद्दल सर्वांना सांगेल. या दबावाखाली दोघींनीही त्यांच्या बॉयफ्रेंडसह हत्येचा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कविता आणि सोनमने सुभाषला मारण्यासाठी त्यांच्या बॉयफ्रेंडना तयार केलं. 

२३ जून रोजी सुभाष शेतात पाणी देण्यासाठी गेला तेव्हा कविता आणि सोनमने व्हॉट्सअॅप कॉलद्वारे विपिनला माहिती दिली. विपिनने त्याच्या मित्राला शेताजवळ  आणलं आणि त्याच्या मदतीने सुभाषवर गोळी झाडली. जखमी झालेला सुभाषने तेथून जाणाऱ्या एका तरुणाची मदत मागितली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

हत्येनंतर कविता आणि सोनम सामान्य जीवन जगत होते. लोकांसमोर दुःख व्यक्त करत होते. पण जेव्हा पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि लोकेशनची चौकशी सुरू केली तेव्हा संपूर्ण प्रकार उघड झाला. पोलिसांनी मोबाईल डेटा शोधला तेव्हा त्यांना आढळलं की हत्येच्या दिवशी विपिन आणि त्याच्या मित्राचं तेच लोकेशन होतं. सोनम, कविता, विपिन आणि गुलजार यांच्यात व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक कॉल आणि चॅट सतत सुरू होते. 

एका चॅटमध्ये विपिनने "डार्लिंग... काम झालं" असं सोनमला म्हटलं. त्यावर सोनमने "मी पप्पांसोबत चुकीचं केलं" असं म्हटलं आहे. एसपी ग्रामीण डॉ. राकेश कुमार मिश्रा म्हणाले की, सुभाषच्या हत्येप्रकरणी चार पोलीस पथकांनी सतत तपास केला आणि पाचही आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये पत्नी कविता, मुलगी सोनम, गुलजार, विपिन आणि विपिनच्या मित्राचा समावेश आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस