शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मला हे नातं नकोय... मंगळसूत्र, जोडवी टेबलावर आपटत आई-वडील निघून गेले; मुलींना पोलीस ठाण्यातच टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:51 IST

तेलंगणामध्ये समुपदेशादरम्यान आई वडिलांनी दोन लहान मुलींना पोलीस ठाण्यात सोडून पळ काढला.

Telangana Couple Crime: रागाच्या भरात माणूस किती टोकाचं पाऊल उचलू शकतो, याचा एक धक्कादायक उदाहरण तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात आला. कौटुंबिक वादातून एका दाम्पत्याने चक्क पोलीस ठाण्यातच आपल्या दोन चिमुरड्या मुलींना वारऱ्यावर सोडून पळ काढला. आईने रागाच्या भरात आपले मंगळसूत्र आणि जोडवी काढून टेबलावर फेकली आणि तिथून निघून गेली. तर मागोमाग पित्यानेही रडणाऱ्या मुलींची पर्वा न करता तिथून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी कुमार आणि ललिता यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. रवी हा दुकानदार असून ललिता नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. लग्नानंतर काही वर्षे सुखात गेल्यानंतर त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. गेल्या काही काळापासून त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला होता की, प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.

काऊन्सलिंग दरम्यान संतापाचा उद्रेक

२८ एप्रिल रोजी करीमनगरमधील लोअर मानैर डॅम पोलीस ठाण्यात या पती-पत्नीला समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते. पोलीस अधिकारी दोन्ही बाजूंना समजून सांगत असतानाच अचानक ललिताचा संयम सुटला. तिने संतापून स्वतःचे मंगळसूत्र आणि पायातील जोडवी काढून पोलिसांच्या समोर टेबलावर आपटली. मला हे नातं नकोय आणि या मुलींची जबाबदारीही नकोय, असे ओरडत ती तरातरा पोलीस ठाण्याबाहेर निघून गेली.

पत्नी पाठोपाठ पती रवी कुमार यानेही मुलींकडे ढुंकूनही न पाहता पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला. आपल्या डोळ्यादेखत आई-वडील सोडून गेल्याचे पाहून दोन्ही चिमुरड्या मुली घाबरून ढसाढसा रडू लागल्या.

खाकी वर्दीतील माणुसकी

आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडलेल्या त्या मुलींना पाहून पोलीसही हेलावले. पोलिसांनी तात्काळ मुलींना सावरले, त्यांना खाऊ दिला आणि त्यांचे रडणे थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन्ही पालकांना वारंवार फोन केले, मात्र दोघांनीही फोन उचलले नाहीत. अखेर पोलिसांनी मुलींच्या आजीला संपर्क करून पोलीस ठाण्यात बोलावले आणि दोन्ही मुलींना त्यांच्या स्वाधीन केले.

गुन्हा नाही, पण पोलिसांची नजर

याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, तेलंगणा पोलीस या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. "त्या मुलींची सुरक्षितता आणि त्यांचे भविष्य हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. रागाच्या भरात पालकांनी घेतलेला हा निर्णय मुलांच्या मनावर गंभीर परिणाम करू शकतो," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Couple abandons daughters at police station after marital dispute.

Web Summary : In Telangana, a couple left their two daughters at a police station after a heated argument during counseling. The mother threw her mangalsutra and jewelry, declaring she wanted no relationship or responsibility. Police cared for the children, handing them to their grandmother. No case was filed, but police are monitoring the situation.
टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस