शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पत्नीचा खून करून पतीचीही आत्महत्या, ठाण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 4:13 AM

shocking incident in Thane : वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी आकाशकडे केली होती.

ठाणे : सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याची मागणी करणारी पत्नी अश्विनी (वय १८) हिचा निर्घृण खून करून आकाश समुखराव (२९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. १७) पहाटेच्या सुमारास घडली.वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी आकाशकडे केली होती. यातूनच या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. सध्या ते इंदिरानगर येथील घरात एकत्र कुटुंब पद्धतीने वास्तव्य करीत होते. मात्र, रात्री झोपण्यासाठी ते जवळच असलेल्या रूपादेवी पाडा क्रमांक दोन येथील रणजित शिरसाठ या नातेवाइकाच्या घरी जात होते. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता ते या घरी झोपण्यासाठी गेले. मात्र तिथे पुन्हा त्यांचा याच मुद्द्यावरून वाद झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारी रोजी सकाळी १० वाजले तरी या घरातून काहीच आवाज आला नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकांनी आणि शेजारच्यांनी या घराच्या मागील बाजूने आत डोकावले. त्यावेळी आकाश एका साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला. त्यावेळी या घराच्या छताचा पत्रा उचकटून स्थानिकांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याची पत्नी अश्विनी हीदेखील रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. जवळच लोखंडी हातोडाही होता. तिच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केल्याचे आढळले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त विनय राठोड, सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. 

तपास सुरूश्रीनगर पोलिसांनी आकाशविरुद्ध पत्नीचा खून आणि स्वत: आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त बजबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी