शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

रेल्वेच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू; घरगुती वादाचे ठरले बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 3:22 PM

दोघांमध्ये झालेल्या घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. 

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी रात्री रेल्वेच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू झाला. जयेश (२५) व आकाश मिलिंद बागूल (२०; रा राजनगर मुकुंदवाडी ) अशी मृत भावांची नावे आहेत. दोघांमध्ये झालेल्या घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, जयेश आणि आकाश हे मुकुंदवाडी येथील राजनगर येथे राहत. जयेश बिगारी काम करत असे तर आकाश रिक्षा चालवत असे. रविवारी सायंकाळी दोघांमध्ये काही घरगुती कारणांमुळे वाद झाले. रागाच्या भरात जयेश, मी आत्महत्या करत असल्याचे सांगत घरातून बाहेर पडला. हे ऐकताच आकाश त्याच्या मागे गेला. जयेश मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसराकडे धावतच निघाला. याच दरम्यान तेथून जनशताब्दी एक्स्प्रेस धावत होती. जयेश व रेल्वेत कमी अंतर राहिले होते. यामुळे पुढे धावणाऱ्या जयेशला आकाश ने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनाही रेल्वेची जोरदार धडक बसली. यातच त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादmukundawadi areaमुकुंदवाडी परिसरAccidentअपघातDeathमृत्यू