शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

कोपरीत भरदिवसा थरार; पूर्ववैमनस्यातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 16:48 IST

Fatal attack on family : तिघा भावंडांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक

ठळक मुद्देपोलीसांच्या निष्काळजीमुळे गुन्हेगाराला बळ मिळाल्याने त्यातूनच हा हल्ला घडल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबीयांनी केला आहे.तिथे राहणाऱ्या रामदुलारी वैश्य कुटुंबाचे जवळच राहणाऱ्या प्रकाश अय्यर (श्रीनिवास) याच्यासोबत किरकोळ भांडण होते.

नवी मुंबई : जुन्या वादाचा बदल घेण्याच्या भावनेतून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना कोपरी येथे घडली आहे. यामध्ये तिघे भावंडे गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पोलीसांच्या निष्काळजीमुळे गुन्हेगाराला बळ मिळाल्याने त्यातूनच हा हल्ला घडल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबीयांनी केला आहे.बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोपरी येथे हा थरार घडला. तिथे राहणाऱ्या रामदुलारी वैश्य कुटुंबाचे जवळच राहणाऱ्या प्रकाश अय्यर (श्रीनिवास) याच्यासोबत किरकोळ भांडण होते. काही दिवसांपूर्वी रामदुलारी यांची मुलगी काजल हिच्यासोबत देखील अय्यर याने किरकोळ कारणावरून भांडण केले होते. याप्रकरणी एपीएमसी पोलीसठाण्यात दोन्ही कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल आहे. मात्र अय्यर हा जाणीवपूर्वक भांडण काढत असल्याची तक्रार वैश्य कुटुंबाने एपीएमसी पोलीसांना दिली होती. त्यानंतरही पोलीसांकडून त्याच्या विरोधात ठोस कारवाई केली नव्हती. परिणामी अय्यर हा वैश्य कुटुंबाचा काटा काढण्याच्या उद्देशाने ४ ते ५ सहकाऱ्यांसह बुधवारी सकाळी दबा धरून बसला होता. यावेळी अमित वैश्य (२६) हा कामानिमित्ताने घराबाहेर निघाला असता सोसायटीतच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यावेळी त्याठिकाणी त्याची बहीण काजल (२७) व भाऊ हृतिक (१६) त्याठिकाणी आले असता त्यांच्यावर देखील वार करण्यात आले. यादरम्यान झालेल्या आरडा ओरडा मुळे तिथे जमाव जमलं असता मारेकरूनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर तिघाही जखमींना वाशीच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काजल व अमित यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तिघांच्याही गळ्यावर व पोटावर वार झाले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.अटकेनंतरही धमकी हल्ल्याच्या घटनेनंतर अय्यर याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रामदुलारी वैश्य यांना अय्यर याने "तू वाचला असून, तुला नंतर बघून घेतो" अशी धमकी दिली. त्यामुळे तिथला जमाव अधिकच भडकला होता.पोलीस ठाण्याबाहेर आक्रोशवैश्य कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात तिघे भावंडे गंभीर जखमी झाल्याचे समजताच त्यांच्या सुमारे २०० परिचितांनी एपीएमसी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. यावेळी जखमींच्या प्रकृतीवरून चिंता व्यक्त करत त्यांच्याकडून टाहो फोडला जात होता. तर मारेकरू प्रकाश अय्यर विरोधात अनेकदा तक्रार करूनही त्याला पोलीसांनी पाठीशी घातल्यानेच हा प्रसंग घडल्याचा आरोप रामदुलारी वैश्य यांनी केला आहे.मारेकरू सराईत गुन्हेगार प्रकाश अय्यर हा सराईत गुन्हेगार असून सतत नशेत असतो. त्याला कोनी विरोध केल्यास सूड उगवण्याच्या भावनेतून तो हल्ला करतो किंवा खोट्या तक्रारी करत असतो. यापूर्वी त्याने स्वतःवर वार करून नितीन भोईर व नातेवाईकांवर खोटी तक्रार केली होती. यानंतरही अय्यर याच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस