शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

मच्छी बनवता येत नसल्याने सुनेची केली सासरच्यांनी हत्या, मार्चमध्ये झाले होते लग्न

By पूनम अपराज | Updated: November 18, 2020 19:18 IST

Murder : खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह पोत्यात भरून ठेवला होता, त्यानंतर सासरच्यांनी गावाजवळील कालव्याजवळ पोतं फेकलं. 

ठळक मुद्देमहिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती आणि इतर सासरच्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.

बिहारच्या सुपौलमध्ये मच्छी बनवता आली नसल्यामुळे सुनेला सासरच्यांनी ठार मारले. खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह पोत्यात भरून ठेवला होता, त्यानंतर सासरच्यांनी गावाजवळील कालव्याजवळ पोतं फेकलं. जेव्हा माहेरच्या मंडळीला महिलेविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही, तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. लोकांनी माहितीवरून पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती आणि इतर सासरच्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.कोसी नदीवर मृतदेह सापडलारतनपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोसी पूर्व तटबंध  ढांढा   गावाजवळ कोसी नदीच्याआधी दोन दिवसापुर्वी पोत्यात भरलेला महिलेचा मृतदेह सापडला. लोकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून  महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच तिची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले गेले. जर महिलेची ओळख पटली तर त्या महिलेच्या मृत्यूचा गुंता देखील सुटेल.सुनीला देवी असे या महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेच्या घरातील सदस्यांनी तिच्याबाबत पोलीस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दाखल केली होती. महिलेचा मृतदेह पाहून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. त्याचवेळी सुनिला देवीचे वडील विशुनदेव पासवान  (राहणारे मटीयारी) यांनी पोलिसांना सांगितले की, मार्च 2020 मध्ये मुलीचे लग्न शैतानपट्टी पंचायतीच्या  ढांढा    गावात राहणारे अमलेश पासवान याचा मुलगा शेष पासवान याच्याशी झाले होते.दिवाळीनंतर मामा मुलीकडे गेले असता ती सासरच्या घरात सापडली नाही. जेव्हा आम्हाला सासरच्या लोकांकडून याची माहिती मिळाली, तेव्हा सासरच्या लोकांना अनेक करणे देण्यास सुरुवात केली.यानंतर, तिच्यावर काही अनुचित प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करत माहेरच्या लोकांनी रतनपूर पोलिस ठाण्यात सुनीला देवी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. रविवारी पूर्व कोसी तटबंदीच्या  ढांढाजवळ कोसी नदीत पोत्यात अडकलेल्या महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून याबाबत विशुनदेव यांना माहिती दिली. मृत मुलीच्या वडिलांना त्यांची मुलगी असल्याचे ओळखले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको करून खळबळ माजवली. पोलिसांनी लोकांना समजून सांगितलं  आणि प्रकरण मिटवलं. महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.नवरा आणि सासऱ्याला अटकपोलिसांनी आरोपी पती शिवेश कुमार आणि सासरे अमरेश पासवान यांना काल रात्री छापा टाकून रतनपुरा भागातून अटक केली. पोलिसांनी आरोपी पतीची चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या करून प्रेत नदीत फेकल्याचे कबूल केले. त्याचवेळी हत्येचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, पत्नी सुनिला देवी मासेमच्छी बनवू शकत नाही, या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. वादाच्या वेळी सुनीलाने आपल्या पतीशी वाद घालण्यास सुरुवात केली, यामुळे पती संतापला आणि त्याने पत्नीची हत्या केली. या घटनेत शिवेशच्या आई आणि वडिलांनीही पाठिंबा दर्शविला. पोलिस प्रमुख रतनपुरा रणवीर कुमार राऊत यांनी सांगितले की, तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांना तुरूंगात पाठविण्याची कारवाई केली जात आहे.

टॅग्स :MurderखूनBiharबिहारArrestअटकPoliceपोलिस