शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बहिणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाऊ २ वर्ष कैदेत; आता कोर्टासमोर खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 17:03 IST

२०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली होती. या मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं की, २०१७ मध्ये जेव्हा मी घरात कुणी नव्हतं तेव्हा माझ्या भावानं माझ्यावर बलात्कार केला

ठळक मुद्देपीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. हे प्रकरण कोर्टात पोहचलंअल्पवयीन मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जात होती.ही गोष्ट तिच्या भावाला समजल्यानंतर त्याने बहिणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला विरोध केला

मुंबई – शहरातील कोर्टाने एका व्यक्तीला अल्पवयीन बहिणीचा बलात्कार केल्याचा आरोपाखाली दोषी ठरवत त्याला २ वर्षाची शिक्षा सुनावली. आरोपी भाऊ २ वर्ष जेलमध्ये बंद होता. परंतु आता त्याच्या बहिणीनं कोर्टासमोर सत्य आणल्यानं मोठा खळबळजनक खुलासा झाला आहे. खोटं बोलून भावाची फसवणूक केल्याचं बहिणीनं कोर्टासमोर कबुल केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे.

२०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली होती. या मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं की, २०१७ मध्ये जेव्हा मी घरात कुणी नव्हतं तेव्हा माझ्या भावानं माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये पुन्हा संधी मिळताच त्याने तोच प्रकार केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. हे प्रकरण कोर्टात पोहचलं. पोलीस तपास, मुलीचा जबाब आणि दोन साक्षीदारांच्या हवाल्याने कोर्टात भावाला दोषी ठरवण्यात आलं. कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावली. आरोपी २ वर्ष कैदेत होता. त्यानंतर आता आरोपीची बहिण दिंडोशी कोर्टात पोहचली आणि तिने भावाने माझा बलात्कार केला नाही असं कबुल केले आहे.

काय आहे प्रकरण?

अल्पवयीन मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जात होती. ही गोष्ट तिच्या भावाला समजल्यानंतर त्याने बहिणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला विरोध केला. अनेकदा मारहाणही केली. त्यावरुन नाराज झालेल्या बहिणीनं भावाविरोधात तक्रार दाखल केली. आता या मुलीच्या कबुलीनाम्यावरुन कोर्टाने आरोपीला निर्दोष ठरवत त्याची सुटका केली आहे. याचबरोबर युवकाच्या बहिणीनं तक्रार दाखल करताना तिची मेडिकल चाचणी केली नव्हती असंही सांगितलं आहे.

आता या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २ वर्ष या युवकाचं जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण करणार? अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. डॉ. मनस्वी अस्थाना म्हणतात की, अशाप्रकारे खोट्या तक्रारी आणि घरगुती वादातून नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. हे भविष्यासाठी चांगले नाही. लोकांमधील भावनिक नातं संपत चाललं आहे. खोट्या तक्रारी देऊन बदला घेण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी तोडगा काढायला हवा असं त्यांचे म्हणणं आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCourtन्यायालय