शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मालाड सबवे येथे कारमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 4:29 PM

इरफान खान (३८) आणि गुलशाद शेख (४०) अशी मृत इसमांची नावे आहेत. 

ठळक मुद्देसोमवारी रात्री ही ११. ३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली मालाड पोलीस ठाण्यात याबाबत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अडकलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

मुंबई - मालाड सबवे येथे पाणी भरल्याने सब-वे म्हणजेच रेल्वे ब्रिजच्या खाली स्कॉर्पिओ कारमध्ये (एमएच ०१; बीए२१६९) अडकलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सोमवारी रात्री ही ११. ३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून आज पहाटे चार वाजता रुग्णालयाने दोघांना मृत घोषित केले. मालाड पोलीस ठाण्यात याबाबत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इरफान खान (३८) आणि गुलशाद शेख (४०) अशी मृत इसमांची नावे आहेत. 

काल रात्री ११. ३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कालही दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळीही पावसाने जोर धरल्याने मालाडच्या सब-वेमध्ये खूप पाणी भरले. रात्रीच्यावेळी एक स्कॉर्पिओ या सब-वेतून जात असताना ही कार अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात अडकली. दहा फूट पाण्यात कार फसल्याने कार पुढे जाऊ शकली नाही. तसेच मागेही नेता येत नव्हती. कारच्या सर्व बाजूने पाणी भरल्याने कारमध्ये असलेले इरफान खान आणि गुलशाद शेख हे मित्र कारमध्येच अडकले. इरफान खान यांनी कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता पाण्याच्या प्रवाहाने कारची काच फुटली आणि कारमध्ये पाणी शिरल्याने त्यांना बाहेर पडणं मुश्किल झालं. परिणामी या दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला. 

रात्रीचा अंधार असल्यानं ही काळ्या रंगाची कार कुणालाही दिसली नाही. हा प्रकार उघड झाल्यावर अग्निशमन दलाच्या सहाय्याने कारमधून दोघांना बाहेर काढण्यात आले.  रात्री घटनास्थळी पोलीस देखील झाले आणि दोघांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले.  याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करत आहेत.  

 

 

टॅग्स :Deathमृत्यूRainपाऊसMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटcarकारPoliceपोलिस