शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Badaun Gangrape Case : "पीडिता संध्याकाळी एकटीच घराबाहेर गेली नसती तर अशी घटना घडलीच नसती"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 1:33 PM

Badaun Gangrape Case : राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी बदायूंमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला व तिची हत्या करण्यात आली. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसविण्यात आली. याप्रकरणी एका पुजाऱ्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महिलेने कोणाच्याही प्रभावाखाली एकटं बाहेर पडायला नको होतं. पीडित महिला संध्याकाळी एकटीच बाहेर गेली नसती तर अशी घटना घडली नसती असं चंद्रमुखी यांनी म्हटलं आहे. 

चंद्रमुखी देवी यांच्या या वादग्रस्त विधानवरून अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जोरदार टीका केली आहे. मात्र टीकेचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतले आहे. तसेच विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांनी बदायूंमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबीयांची भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रमुखी यांनी महिलांनी कोणत्याही वेळी घराबाहेर पडू नये. पीडिता संध्याकाळच्या वेळी एकटी बाहेर गेली नसती तर ही घटना घडली नसती असं म्हटलं. 

महिलेला फोन करून बोलावण्यात आलं होतं. यामुळे हे प्रकरण सुनियोजित होतं. फोन आल्यावर पीडित महिला तिथे गेली आणि अशी परिस्थिती उद्भवली असं देखील चंद्रमुखी देवी म्हणाल्या. मात्र त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. बदायूं सामूहिक बलात्कार प्रकरणी विविध वृत्तवाहिन्यांमधून आपलं विधान दाखवण्यात येत आहे. महिलांनी संध्याकाळी घराबाहेर पडू नये असं दाखवलं जात आहे. मात्र आपण या संदर्भात काहीही बोललो नाही. आपल्या विधानाचा कुठूनही अर्थ निघत असेल तर ते मी मागे घेते आणि पीडित कुटुंब आणि महिलांची माफी मागते, असं चंद्रमुखी यांनी म्हटलं आहे. 

बदायूं बलात्कार प्रकरणावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे गेल्या 14 सप्टेंबर रोजी 19 वर्षे वयाच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार पीडितेच्या गुप्तांगात व पायांना जखमा झाल्याचे व मारहाणीत बरगड्या मोडल्याचे उत्तरीय तपासणीत आढळून आले. ही महिला देवळात दर्शनाला गेली होती. त्यानंतर ती मृतावस्थेत आढळली. या गुन्ह्यातील आरोपी असलेला पुजारी सध्या फरार असून, त्याचा कसून शोध सुरू आहे.

महिला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष - प्रियंका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सांगितले की, उत्तरप्रदेशमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्या राज्यातील प्रशासनाचा दृष्टिकोन चांगला नाही. हाथरसच्या बलात्कार प्रकरणात राज्य सरकारच्या प्रशासनाने पीडितेच्या म्हणण्याकडे दुर्लक्षच केले. बदायूंत जिथे बलात्कार झाला त्या ठिकाणाची पोलिसांनी तपासणीही केली नाही.

"मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी करतात"

देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त विधान केलं होतं. "बहुतांश मुली या आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात" असं विधान महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं होतं. "जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांना जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. मात्र जेव्हा त्यांचे असे हे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात" असं नायक यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी