शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

मर्डर मिस्ट्री! हनिमूनच्या रात्रीचं गूढ... वधूकडे नव्हता मोबाईल; पोलिसांना भलताच संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:34 IST

शिवानीचं कुटुंब दिल्लीत राहत होतं आणि गेल्या एक वर्षापासून या लग्नाची चर्चा होती.

अयोध्येत हनिमूनच्या रात्री वधू आणि वर दोघांच्याही मृत्यूचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक गोष्टीही समोर आल्या आहेत. वधू शिवानीचा गळा दाबल्याने मृत्यू झाला तर वर प्रदीपचा गळफास घेतल्याने मृत्यू झाला. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात एक गोष्ट समोर येत आहे की, रात्री प्रदीपच्या मोबाईलवर काही मेसेज किंवा फोटो आले असावेत ज्यामुळे दोघांमध्ये बिनसलं.

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, खोलीचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे बाहेरील व्यक्ती आत जाण्याची शक्यता नव्हती. म्हणूनच पोलीस सध्या असा अंदाज लावत आहेत की, प्रदीपने आधी शिवानीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. एसएसपी राज करण नय्यर हे शिवानी आणि प्रदीपच्या पालकांशी स्वतंत्रपणे बोलून हे प्रकरणाचा तपास करत आहेत. 

शिवानीकडे नव्हता मोबाईल

शिवानीचं कुटुंब दिल्लीत राहत होतं आणि गेल्या एक वर्षापासून या लग्नाची चर्चा होती. मुलीच्या कुटुंबाने एप्रिलमध्ये लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु प्रदीपच्या कुटुंबाने मार्चमध्येच लग्न करण्याचा आग्रह धरला, ज्यावर सहमती झाली. लग्नापूर्वी शिवानी आणि प्रदीप एकमेकांशी बोलत होते, असं सांगितलं जात आहे, परंतु एक आश्चर्यकारक गोष्ट अशीही समोर आली आहे की शिवानीकडे मोबाईल नव्हता. मोबाईल का नव्हता असा प्रश्न आता अनेकांच्या मनात आहे. 

मृत्यूपूर्वी काय घडलं?

पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात एक अँगल समोर येत आहे की, रात्री मोबाईलवर काही मेसेज किंवा फोटो आले असावेत, त्यानंतर दोघांमध्ये बिनसलं असावं. एखाद्या गोष्टीचा राग आल्यानंतर प्रदीपने शिवानीचं तोंड दाबलं असावं आणि तिचा गुदमरून मृत्यू झाला. जेव्हा हे प्रदीपला कळलं तेव्हा घाबरून त्याने कदाचित आपला जीव देण्याचा निर्णय घेतला असेल. हा फक्त एक अँगल आहे, अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.

या संपूर्ण घटनेत कुटुंबातील सदस्य उघडपणे काहीही बोलण्याचं टाळत आहेत. विशेषतः शिवानीकडे मोबाईल नसल्याचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. त्याच वेळी, पोलिसांनाही कोणताही ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस