शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्त मनपाचे आयुक्त कधीपासून झाले?

By admin | Updated: June 10, 2016 00:05 IST

औरंगाबाद : मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बड्या मालमत्ताकर थकबाकीदारांचा दरबार भरवून पोलिसी खाक्या दाखविल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

औरंगाबाद : मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनपाच्या बड्या मालमत्ताकर थकबाकीदारांचा दरबार भरवून पोलिसी खाक्या दाखविल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या या ‘कर वसुलीची’तक्रार मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकण्याचा इशारा देत पोलीस आयुक्त मनपाचे आयुक्त कधीपासून झाले, असा सवाल करून अप्रत्यक्षपणे मनपा आयुक्त बकोरिया यांना टोला लगावला. पोलीस प्रमुख मनपाचे काम पाहू लागले हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे, असे म्हणावे लागेल. पोलिसांचा धाक दाखवून मालमत्ताकर वसूल करण्यामुळे नागरिकांच्या मनात दहशत बसल्यास चुकीचा संदेश जाईल. मनपा आयुक्तांना हा निर्णय घेण्याची गरज काय आहे. ही लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीत ज्याप्रमाणे पूर्ण देशात कर वसुली होते. त्याचाच वापर झाला पाहिजे. याप्रकरणी मनपा आयुक्तांकडूनदेखील माहिती घेण्यात येईल, असे पालकमंत्री कदम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी थांबविण्याचे काम केले पाहिजे. वाळूज परिसरातील सागर नाडे या तरुणाच्या आत्महत्येला पोलीस आयुक्त जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हा पूर्णत: कू्ररपणा असून, पोलीस आयुक्तांची ही दहशत खपवून घेतली जाणार नाही. भाजपची भूमिकाउपमहापौर प्रमोद राठोड यांनी मालमत्ताकरप्रकरणी काही तक्रारी असतील तर त्या नगरसेवकांमार्फत सोडविण्यात येतील. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी भाजप नगरसेवकांकडे कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, १० वर्षांपासून काही बड्या मालमत्ताधारकांकडे कर थकीत आहे. तो कर तर पालिकेला मिळालाच पाहिजे. सर्वसामान्यांचा कर वसुलीसाठी पालिका दारात उभी राहते. परंतु बडे थकबाकीदार अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जुमानत नाहीत. त्यांच्याकडून कर मिळण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे. आयुक्तांनी पोलिसांकडे जाण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेतले असते तर हा वाद उफाळला नसता, असे मत भाजपने व्यक्त केले.