शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

फोडण्यासारखे शिल्लक काय? काँग्रेस,राष्ट्रवादीचे अस्तित्व शून्य; अब्दुल सत्तारांचा टोपेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:02 IST

माझ्या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा वाद घालायचा नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा.

औरंगाबाद : जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अस्तित्व शून्य असल्याचा दावा करून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी खळबळ उडवून दिली. कधी काळी नंबर एकवर असलेल्या या दोन्ही पक्षांच्या अवस्थेला भाजप जबाबदार असल्याचे सांगून आम्हीच भाजपला लवकरच खिंडार पाडू, असा शड्डूही ठोकला.

विभागीय आयुक्तालयात नियोजित आढावा बैठकीसाठी राज्यमंत्री सत्तार आले असताना त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेनेचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री सत्तार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याची तक्रार खा.सुप्रिया सुळे यांच्या समक्ष राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सोमवारी (दि.१८) केली होती. यासंदर्भात सत्तार यांना पत्रकारांनी छेडले असता, ते म्हणाले की, टोपे यांच्या बोलण्याचा उद्देश काय होता मला माहिती नाही. त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य फोडण्याचा काय संबंध आहे. फोडण्यासारखे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे? त्यांना काही मदत लागली तर आम्ही करू. त्यासाठी समन्वय बैठक घेऊ.

माझ्या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा वाद घालायचा नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. ‘एक नंबर’वरून काँग्रेस, राष्ट्रवादी शून्यावर आले आहे. कारण भाजपने त्यांचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी ओढून घेतले आहेत. निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिटदेखील जप्त झाले. दरम्यान रोहयो मंत्री भूमरे यांच्याशी याप्रकरणात संपर्क होऊ शकला नाही.

आता नजर भाजपकडेजिल्ह्यातील भाजपचे मोठे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची तारीख निश्चित झाली की, सगळे समोर येईल. आताच प्रवेश करणाऱ्यांची नावे सांगितली तर भाजपा नेते त्यांच्या घरी जाऊन विनवण्या करत बसतील. त्यामुळे वेळ आल्यावर सगळे काही जाहीर करेन. आगामी जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी रणनीती आखली जात आहे, असे राज्यमंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले.

ती सभा कायदा-सुव्यवस्थेला बाधकमनसेप्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी होणारी सभा कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने योग्य नाही. त्यांचा अयोध्या दौरा राजकारण असल्याची टीका सत्तार यांनी केली.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेस