शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फोडण्यासारखे शिल्लक काय? काँग्रेस,राष्ट्रवादीचे अस्तित्व शून्य; अब्दुल सत्तारांचा टोपेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:02 IST

माझ्या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा वाद घालायचा नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा.

औरंगाबाद : जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अस्तित्व शून्य असल्याचा दावा करून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी खळबळ उडवून दिली. कधी काळी नंबर एकवर असलेल्या या दोन्ही पक्षांच्या अवस्थेला भाजप जबाबदार असल्याचे सांगून आम्हीच भाजपला लवकरच खिंडार पाडू, असा शड्डूही ठोकला.

विभागीय आयुक्तालयात नियोजित आढावा बैठकीसाठी राज्यमंत्री सत्तार आले असताना त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेनेचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री सत्तार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याची तक्रार खा.सुप्रिया सुळे यांच्या समक्ष राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सोमवारी (दि.१८) केली होती. यासंदर्भात सत्तार यांना पत्रकारांनी छेडले असता, ते म्हणाले की, टोपे यांच्या बोलण्याचा उद्देश काय होता मला माहिती नाही. त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य फोडण्याचा काय संबंध आहे. फोडण्यासारखे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे? त्यांना काही मदत लागली तर आम्ही करू. त्यासाठी समन्वय बैठक घेऊ.

माझ्या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा वाद घालायचा नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. ‘एक नंबर’वरून काँग्रेस, राष्ट्रवादी शून्यावर आले आहे. कारण भाजपने त्यांचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी ओढून घेतले आहेत. निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिटदेखील जप्त झाले. दरम्यान रोहयो मंत्री भूमरे यांच्याशी याप्रकरणात संपर्क होऊ शकला नाही.

आता नजर भाजपकडेजिल्ह्यातील भाजपचे मोठे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची तारीख निश्चित झाली की, सगळे समोर येईल. आताच प्रवेश करणाऱ्यांची नावे सांगितली तर भाजपा नेते त्यांच्या घरी जाऊन विनवण्या करत बसतील. त्यामुळे वेळ आल्यावर सगळे काही जाहीर करेन. आगामी जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी रणनीती आखली जात आहे, असे राज्यमंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले.

ती सभा कायदा-सुव्यवस्थेला बाधकमनसेप्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी होणारी सभा कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने योग्य नाही. त्यांचा अयोध्या दौरा राजकारण असल्याची टीका सत्तार यांनी केली.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेस