शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दुष्काळावर मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ कार्यशाळा

By admin | Published: January 09, 2015 12:19 AM

बीड : राज्यात वारंवार दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला मार्च महिन्यापासून सुरवात होत आहे.

बीड : राज्यात वारंवार दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला मार्च महिन्यापासून सुरवात होत आहे. योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी गाव समितीपासून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांना जलसंधारणचे सचिव प्रभाकर देशमुख व इतर आयुक्तांनी कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन केले.येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरूवारी ‘जलयुक्त शिवार’ अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सचिव प्रभाकर देशमुख, औरंगाबाद विभागाचे आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित,आ. भीमराव धोंडे, आ. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते. योजना प्रभावीपणे राबविल्यास राज्य पाणीटंचाईतून मुक्त होईल असा विश्वास ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला. प्रत्येक गावाला केंद्रबिंदू मानून कर्मचाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्याची पाणीटंचाईतून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाची रुपरेषा यावेळी मांडण्यात आली. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही योजना राज्यात कार्यन्वित होणार आहे. योजनेअंतर्गत २०१९ पर्यंत राज्य पाणीटंचाईतून मुक्त करण्याचा निर्धार असून ही योजना स्थानिक पातळीवर कशी राबवायची याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.राज्यात २० हजार सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. योजनेत नरेगा, पाणलोट प्रकल्प हे एकत्र राबविणार असल्याचे सचिव प्रभाकर देशमुख म्हणाले. जलपातळी वाढविण्यासाठी सिमेंट बंधारे, नरगेच्या योजनेतील कामे तर कृषि विभागातील योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)सध्या राज्यातील २३ हजार गावात पाणीटंचाई जाणवत आहे. योजनेत जुने ८ हजार सिमेंट बंधारे दुरूस्त होणार आहेत. विभागाप्रमाणे ६ हजार बंधाऱ्याचे वाटप होणार आहे. शिवाराचा आराखडा पाहून नव्याने कामे दिली जातील, असेही सचिव प्रभाकर देशमुख म्हणाले. योजनेअंतर्गत राज्यातील ५ हजार गावांची पाणीटंचाई दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे.