शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘बिंदुसरा’तील पाणी गळती सुरूच

By admin | Updated: November 24, 2014 00:36 IST

सोमनाथ खताळ, बीड यावर्षी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पाण्याची भीषण टंचाई. एवढी गंभीर परिस्थिीती उद्भवलेली असतानाही आजही पालीच्या

सोमनाथ खताळ, बीडयावर्षी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पाण्याची भीषण टंचाई. एवढी गंभीर परिस्थिीती उद्भवलेली असतानाही आजही पालीच्या बिंदुसरा धरणातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे या पाण्याचा सर्रास शेतीसाठी वापर केला जात आहे. याकडे मात्र संबंधित विभाग ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.बीड शहराला तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणाची पाणीपातळीही सध्या जोत्याखाली आहे. त्यामुळे बीडकरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेची पळापळ सुरू आहे. अशातच बिंदुसरा धरणातून राहिलेले पाणीही लवकरच संपण्याची भिती पालिकेने वर्तविली होती. मागील वर्षभरापासून धरणाच्या भिंतीला तीन भलेमोठे भगदाड पडले होते. यातून दररोज पंधरा लिटर पाणी वाया जात होते. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून पाणीगळती थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्या पुन्हा या धरणातून पाणी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे झालेले काम निकृष्ठ झाले की, भिंत धोक्यात आली आहे, याचे उत्तर मात्र संबंधितांना देता येत नाही. धरणाच्या भिंतीचे भगदाड हे मुद्दामहून बुजविले जात नाही, असा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलश जाधव यांनी केला आहे.लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता डी.एम.कोकणे म्हणाले, आम्ही धरणाचे भगदाड सिमेंट काँक्रीट करून बुजविलेले आहेत. भिंतीतून वाया जात असलेल्या पाण्याचा फारसा फरक पडत नाही. ही तांत्रिक समस्या आहे.बिंदूसरा धरणाची पातळी जोत्याखाली गेल्यामुळे शहराला माजलगावच्या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.४माजलगाव धरणातूनही सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याने धरणातील पाणी लवकरच संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे.४धरणातील पाणी आरक्षित करण्यात यावे, या संदर्भात मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठविलेले आहे.४या संदर्भात अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.