शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

पथकावर ठेवणार वॉच

By admin | Updated: July 31, 2014 01:24 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे पुन्हा एकत्रीकरण करण्यात येणार असून, सभापती विजय वाघचौरे यांनी याप्रकरणी आदेश दिले आहेत

औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे पुन्हा एकत्रीकरण करण्यात येणार असून, सभापती विजय वाघचौरे यांनी याप्रकरणी आदेश दिले आहेत. लोकमतने २७ जुलै रोजी अतिक्रमण हटाव पथकाचा पालिकेतच मुक्काम असल्याचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे, सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने सभापती वाघचौरे यांनी प्रभागनिहाय अतिक्रमण काढण्यासाठी गठीत करण्यात आलेले पथक रद्द करून एकत्रित जबाबदारी देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले आहेत. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रभाग अभियंत्यांवर वॉर्डनिहाय अतिक्रमण काढण्यासाठी जबाबदारीचे विकेंद्रीकरण केले होते. मात्र, त्यांच्या उपक्रमाला मुजोर कर्मचाऱ्यांनी फाटा दिला. त्यामुळे अतिक्रमणांना अभय देण्याचे प्रकार वाढले. विभाग पोसण्याचा प्रकार...महापालिका अतिक्रमण पथकाला फक्त पोसत आहे. या पथकाची कार्यपूर्ती काय, कोणत्या भागात कारवाई करायची. हे सगळे ठरवून दिलेले असताना इमारत क्र. ३ मध्येच ते पथक ठाण मांडून असते. त्यांच्या मदतीला देण्यात आलेले पोलीस पथकही अलबेल असून, मर्जीनुसार अतिक्रमण विभागाची मोहीम राबविली जाते. त्यामुळेच आदेश आला तरच पथक इमारत क्र. ३ च्या बाहेर पडते. हप्ते वसुलीमध्ये अडकलेला हा विभाग गब्बर होत असून, पालिकेला कंगाल करीत आहे, तर अनधिकृत बांधकामे, हातगाड्यांना अभय देतो आहे. अतिक्रमण पथकांवर रोज ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च होतो.उपायुक्त म्हणाले... अतिक्रमण पथकाचे मनुष्यबळ वाढावे, यासाठी मागणी केलेली आहे. सध्या प्रभागनिहाय पथक गठीत करण्यात आलेले आहे. त्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असे उपायुक्त किशोर बोर्डे यांनी सांगितले.मालमत्ता अधिकारी म्हणाले..वॉर्ड अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याप्रकरणी तातडीने आदेश दिले आहेत. प्रभागनिहाय वाहने, कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे मालमत्ता अधिकारी एस. डी. काकडे यांनी सांगितले. ४० पत्रे दिली तरीही कर्मचारी मिळेनाततत्कालीन मालमत्ता अधिकारी एस. पी. खन्ना यांनी आस्थापना विभागाला कर्मचारी मिळण्यासाठी ४० पत्रे दिली. मात्र, प्रशासनाने कर्मचारी दिले नाहीत. अतिक्रमण हटाव विभाग आणि मालमत्ता विभागाला कर्मचारी नसल्यामुळे शहराचे विदु्रपीकरण वाढले आहे.