शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जायकवाडी जलाशयात महाकाय मगरीचे दर्शन; शेतकरी, मच्छीमारांमध्ये घबराहट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 19:40 IST

महाकाय मगरीचे  दर्शन झाल्याने जलाशयाच्या काठावरील शेतकरी व मच्छीमारांची भितीने गाळन उडाली आहे.

ठळक मुद्देनाथसागरात अनेक मगर असण्याची शक्यतादोन वर्षानंतर पुन्हा मगर दर्शन

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज सकाळी महाकाय मगरीचे दर्शन धरणावर काम करणाऱ्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना झाले. महाकाय मगरीचे  दर्शन झाल्याने जलाशयाच्या काठावरील शेतकरी व मच्छीमारांची भितीने गाळन उडाली आहे.

दोन वर्षाच्या कालावधी नंतर पुन्हा मगर प्रकट झाल्याने नाथसागर जलाशयात मगरीचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. जायकवाडी धरणावर तांत्रिक विभागामार्फत नियमित कामे सुरू असून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवाजा परिसरात आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान जलाशयात मगरीचे दर्शन झाले. यानंतर पुन्हा धरण नियंत्रण कक्षाच्या पाठिमागे धरणावरील काही कर्मचाऱ्यांना मगर दिसली.

दोन वर्षानंतर पुन्हा मगर दर्शनसन २०१५ ला परभणी जिल्हात सापडलेली मगर वनखात्याने जायकवाडी धरणात आणून सोडली होती. वनखात्याच्या या कृतीस जायकवाडी प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध दर्शविला होता.  या नंतर सन २०१७ ला ८ नोहेंंबर  रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास महाकाय मगर पैठण ते दक्षिण जायकवाडी रस्त्यावर फिरताना आढळून आली होती.पैठण येथील दिलीप सोनटक्के, जालिंदर आडसूळ, राजू गायकवाड, साहेबा ढवळे आतिष गायकवाड आशिष मापारी या तरूणांनी मोठे धाडस करीत या मगरीस जेरबंद करून वन खात्याच्या हवाली केले होते.  वनखात्याने  दोन दिवसानंतर मगरीस नागपूर येथील पेंच अभयारण्यात  हलविले होते. या नंतर मगर नाथसागरात प्रकट झाली नाही दरम्यान बुधवारी परत एकदा दोन वर्षानंतर मगरीचे दर्शन झाले आहे.

नाथसागरात अनेक मगर असण्याची शक्यतानाथ सागरात सन २००६ च्या महापुरानंतर बँकवाटर परिसरात सातत्याने मगर दर्शन होत आहे. २००६ मध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात मगरीचे पिल्ले आले होते. हे पिल्ले पुन्हा वनखात्याने नाथसागरात सोडले होते. साधारणपणे गोड्या पाण्यातील मगर नोहेंबर महिण्यात जलाशया बाहेर येऊन अंडे देते. एका वेळी  २० ते २५ अंडे मगर देते. नोहेबर २०१७ ला जायकवाडी धरणाच्या मत्सबीज केंद्राच्या निर्जन भागातून ही मगर बाहेर पडताना नागरिकांच्या निदर्शनास आली होती. या मुळे या मगरीने या भागात अंडे दिले असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत होता. या शिवाय २००६ च्या महापुरा प्रमाणेच यंदाच्या महापुरात अनेक मगरी जायकवाडी धरणात पुरासोबत आल्या असेही काही जणांचे म्हणने आहे. या मुळे नाथसागरात अनेक मगरी असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीFarmerशेतकरी