शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीच्या गावा; बांधिलकीचा ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 23:54 IST

टीम लोकमत , बीड भालचंद्र गणपती मंदिरामुळे जिल्ह्यात लौकिक प्राप्त करणाऱ्या लिंबागणेश (ता. बीड) या गावाने आता विकासाची कात टाकली आहे

टीम लोकमत , बीडभालचंद्र गणपती मंदिरामुळे जिल्ह्यात लौकिक प्राप्त करणाऱ्या लिंबागणेश (ता. बीड) या गावाने आता विकासाची कात टाकली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत मूलभूत सोयी-सवलती मिळविण्यासाठी झुंजावे लागले. मात्र, गेल्या तीन वर्षांत विकासाच्या खाणाखूणा दिसू लागल्या आहेत. आता ग्रामस्थांना आधुनिकतेची स्वप्नेही पडू लागली आहेत. गणपतीबाप्पांचा वरदहस्त लाभलेल्या या गावात सामाजिक बांधिलकी जपणारे लोकही आहेत. त्यामुळे माणुसकीचे ‘दर्शन’ पावलोपावली घडते.‘लोकमत’ने शनिवारी लिंबागणेश येथे ‘स्पॉट रिपोर्टिंग’ केले. यावेळी गावकऱ्यांनी उपेक्षा अन् अपेक्षा या दोहींची गोळाबेरीज मांडली. पाचशेवर उंबरे अन् तीन हजार लोकसंख्येचे हे गाव जिल्हा परिषदेचा गट आहे. बीड मतदारसंघाचे आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच गटातून झाली. परिसरातील १५ ते २० गावांचा लिंबागणेशमध्ये रोजचा संपर्क असतो. गावाला चिकटूनच भालचंद्र गणपतीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर सोळाव्या शतकातील आहे. हेमाडपंथी बांधकामाचा अजोड नमुना येथे पहावयास मिळतो. भाद्रपद महिन्यात येथे यात्रा भरते. भाविकांची मोठी श्रद्धा असलेल्या या मंदिराला विकासाची प्रतीक्षा आहे. मंदिरावर चोरांची सतत वक्रदृष्टी पडलेली आहे. दगडी शिळा चोरीला गेल्या होत्या; परंतु त्या जिल्ह्याच्या सीमेवर सापडल्या. तत्पूर्वी एकदा व २६ जानेवारी रोजी मंदिरातील दानपेटी फोडली, त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. चोरांनी दानपेटीला हात लावल्यावर सीसीटीव्ही बसविण्यास मुहूर्त मिळाला. भाविकांचा ओघ पाहता येथे पुरेशा सोयी- सुविधा नाहीत. त्यामुळे मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत करावा अन् मंदिराचा कायापालट करावा अशी मागणी गावकरी अनेक दिवसांपासून करताहेत. देवस्थानच्या नावे ६२ एकर जमीन असून मालकी हक्काचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.प्रत्येक गल्लीत दर्जेदार रस्ते, सौरपथदिवे, शौचालये विकासाची साक्ष देतात. मात्र, स्वच्छतेचा अभाव आहे. सार्वजनिक शौचालयाची उणिव आहे. पोलीस चौकीला हक्काची इमारत आदी प्रश्न ऐरणीवर आहेत. सरपंचांनी जपली माणुसकीसरपंच सुषमा बाळकृष्ण मुळे या बारावी उत्तीर्ण. ग्रा. पं. अस्तित्वानंतर पहिल्या महिला सरपंचपदाच्या त्या मानकरी ठरल्या. गावच्या प्रश्नांची सोडवणूक त्या स्वत: करतात. महिलांचे प्र्शन त्या अतिशय संवेदनशीलपणे हाताळतात. निराश्रीत असलेल्या दोन जुळ्या बहिणींना त्यांनी दत्तक घेतले आहे. पोटच्या लेकरागत त्या त्यांना जीव लावतात. बचत गटातून आत्मसन्मान व स्वावलंबनाची चळवळ त्यांनी गतिमान केली आहे. त्यांचे पती बाळकृष्ण हे पत्नीच्या कामात कधी लूडबूड करत नाहीत. विकासाचे निर्णय ग्रामसभेत होतात. त्यात केवळ सरपंचाला खुर्ची असते. वंचित- उपेक्षितांसाठी सरपंच सुषमा व त्यांचे पती बाळकृष्ण हे दोघे कायम मदतीला उभे राहतात.अंगणवाडी इमारतीची दुरवस्था तीनपैकी एका अंगणवाडीच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे बालके, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. उर्वरित दोन अंगणवाड्या सुविधायुक्त आहेत.तलाठी गायबतलाठी एस. एम. पुराणिक गायब होते. खासगी मदतनीस कागदपत्रे चाळताना आढळला.