शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी दहावीतील विद्यार्थ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:17 IST

पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत पाण्याचा तुटवडा असल्याने मोपेडवर कॅन ठेवून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून सुसाट आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना छावणी रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यंदाच्या उन्हाळ्यातील पाण्यासाठीचा हा पहिला बळी गेला आहे.

ठळक मुद्देमोपेडवर पाणी आणण्यासाठी गेला: रस्यावरील ट्रकने चिरडले; जागीच ठार

औरंगाबाद : पडेगाव परिसरातील माजी सैनिक कॉलनीत पाण्याचा तुटवडा असल्याने मोपेडवर कॅन ठेवून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून सुसाट आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना छावणी रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यंदाच्या उन्हाळ्यातील पाण्यासाठीचा हा पहिला बळी गेला आहे.अक्षय महेंद्र चेट्टी (१६, रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अक्षयने नुकतीच दहावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्याला दोन बहिणी असून एकीचे लग्न ठरले आहे. त्याचे वडील पक्षाघातामुळे बेडवर पडून असल्याने घरातील लहान-मोठी कामे अक्षयला करावी लागत. तो राहतो त्या परिसरात पाणीटंचाई असल्याने अक्षयसह परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. नेहमीप्रमाणे अक्षय शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्लास्टिकची कॅन घेऊन मोपेडवरून पाणी आणण्यासाठी छावणी परिसरात जात होता. लष्कराच्या कॅन्टीनसमोरून जात असताना मागून वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने उजव्या बाजूने त्याला जोराची धडक दिली. त्यात तो मोपेडसह ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. या घटनेत तो घटनास्थळीच गतप्राण झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून छावणी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लष्कराचे जवान आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ट्रकखालील मृतदेह काढून घाटीत हलविला. गुन्हा नोंदवून पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक ठोकळ तपास करीत आहेत.चौकटअर्धा तास होता मृतदेह घटनास्थळी पडूनट्रकच्या चाकाखाली दबलेला मृतदेह कसा काढावा, हे प्रत्यक्षदर्शींना समजत नव्हते. यामुळे सुमारे अर्धा तास घटनास्थळी मृतदेह पडून होता. त्यानंतर आधी मोपेड ओढून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर हळूच ट्रक पुढे सरकवण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या गाडीतून घाटी रुग्णालयात हलविण्यात आला.चौकटवृद्धापकाळाची काठी हरवलीअक्षयचे वडील एमआयडीसीमध्ये खाजगी कंपनीत नोकरीला होते. पॅरेलिसीसमुळे त्यांची नोकरी गेली आणि ते बिछाण्यावर पडून आहेत. वडील आजारी असल्यापासून अक्षय धडपड करीत होता. अक्षयच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांची वृद्धापकाळाची काठी हरवली. दोन बहिणींचा लाडका भाऊराया गेल्याने चेट्टी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

टॅग्स :Accidentअपघातwater scarcityपाणी टंचाई