शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

'आघाडी करताना तंगड्यात तंगडं घातलं', उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 16:09 IST

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते.

औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीचं गुणगान गाताना आघाडीवर जबरी टीका केली आहे. 'आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे. त्यामुळे ते नक्कीच पडणार', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर सडकून टीका केली. तसेच 'आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे, असेही उद्धव यांनी म्हटले.  

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते. त्यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 'आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे. त्यामुळे ते नक्कीच पडणार', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीचा पराभव होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे. 'शिवसेनाप्रमुखांनी नेहमी मला गोरगरीबांच्या मुलांची पहिली काळजी घ्यायला, त्यांचे लाड करायला पहिले शिकवले आहे. त्यामुळे माझा, 'भगवा उतरवणे तर सोडाच, कोणाचीही त्या भगव्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये, असा म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

जे काही वाद होते ते मिटले, जबाबदाऱ्यांचे वाटप झालेइथे येईपर्यंत अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्याबाबत चर्चा होती.महाभारतातल्या अर्जुनाप्रमाणे या अर्जुन खोतकर यांना देशद्रोह्याचा डोळा दाखवला.संघर्ष झाला तो झाला, पण आता युतीची जबाबदारी आम्हा दोघांच्या खांद्यावरसंभाजीनगरमधले मूलभूत प्रश्न उदा. समांतर जलवाहिनी, कचऱ्याचा प्रश्न जे जे शक्य आहे ते करून आपण सोडवला पाहिजेमराठवाडा हा भगव्याचा बालेकिल्ला. संभाजीनगरचा हिंदु हा कडवट. त्याला भगव्याचं महत्त्व माहीत आहेआघाडीचे हातात हात आहेत, तर तंगड्यात तंगडं. ते आता पडणारचशिवसेनेने कधीच मागून वार केले नाहीत. शिवसेनेने वारही समोरून  केले आणि दोस्तीही समोरून केली.मतभेद कधीही शिवसेनेने राज्याच्या हिताच्या आड येऊ दिले नाहीतसमृद्धी महामार्गावेळीही आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आम्ही पुढे गेलोमुंबईकरांना 500 स्क्वेअरफूट घराचा मालमत्ता कर माफ करू, हे वचन निभावलंनाणार इथला प्रकल्प रद्द केला. इथले पाणी, चाऱ्याचा प्रश्नही सोडवले गेलेच पाहिजेत. शेतकऱ्यांचे कर्जही माफ झाले पाहिजे.आता शिवसैनिकांनी आरामात राहू नका, युती झाली आता जनतेचे आशीर्वाद मिळवण्याची वेळ आहे.एकवेळ मत मागून मिळतील, पण जनतेचे आशीर्वाद मागून मिळत नाहीत.अनेक योजना जाहीर झाल्या आहेत, त्या राबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत केंद्र सुरू करावीतयुतीने न लढता आपण वेगळं लढत होतो, तेव्हा विरोधकांना माज चढला होता. पण, युती झाल्यानंतर कुठेही त्यांच्या सभा झाल्या नाहीतराधाकृष्ण विखेपाटील म्हणाले की ईडीच्या भीतीने यांनी युती केली, ईडीची भीती कुणाला, तुम्हाला. या ईडापिडा तुमच्याकडे आहेत. आमच्याकडे नाहीतआम्ही जे काही केलं ते खुलेपणाने केलं. पण, विरोधी पक्षातून जो टीका करेल तो पुन्हा त्या पक्षात राहीलच याची खात्री जनतेला राहिलेली नाहीआज आपण सत्तेपेक्षाही लोकांसाठी एकत्र आलो आहोत. आम्हाला सत्ता गोरगरीबांसाठी हवी आहे 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद