शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

'आघाडी करताना तंगड्यात तंगडं घातलं', उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 16:09 IST

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते.

औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीचं गुणगान गाताना आघाडीवर जबरी टीका केली आहे. 'आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे. त्यामुळे ते नक्कीच पडणार', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर सडकून टीका केली. तसेच 'आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे, असेही उद्धव यांनी म्हटले.  

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते. त्यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 'आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे. त्यामुळे ते नक्कीच पडणार', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीचा पराभव होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे. 'शिवसेनाप्रमुखांनी नेहमी मला गोरगरीबांच्या मुलांची पहिली काळजी घ्यायला, त्यांचे लाड करायला पहिले शिकवले आहे. त्यामुळे माझा, 'भगवा उतरवणे तर सोडाच, कोणाचीही त्या भगव्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये, असा म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

जे काही वाद होते ते मिटले, जबाबदाऱ्यांचे वाटप झालेइथे येईपर्यंत अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्याबाबत चर्चा होती.महाभारतातल्या अर्जुनाप्रमाणे या अर्जुन खोतकर यांना देशद्रोह्याचा डोळा दाखवला.संघर्ष झाला तो झाला, पण आता युतीची जबाबदारी आम्हा दोघांच्या खांद्यावरसंभाजीनगरमधले मूलभूत प्रश्न उदा. समांतर जलवाहिनी, कचऱ्याचा प्रश्न जे जे शक्य आहे ते करून आपण सोडवला पाहिजेमराठवाडा हा भगव्याचा बालेकिल्ला. संभाजीनगरचा हिंदु हा कडवट. त्याला भगव्याचं महत्त्व माहीत आहेआघाडीचे हातात हात आहेत, तर तंगड्यात तंगडं. ते आता पडणारचशिवसेनेने कधीच मागून वार केले नाहीत. शिवसेनेने वारही समोरून  केले आणि दोस्तीही समोरून केली.मतभेद कधीही शिवसेनेने राज्याच्या हिताच्या आड येऊ दिले नाहीतसमृद्धी महामार्गावेळीही आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आम्ही पुढे गेलोमुंबईकरांना 500 स्क्वेअरफूट घराचा मालमत्ता कर माफ करू, हे वचन निभावलंनाणार इथला प्रकल्प रद्द केला. इथले पाणी, चाऱ्याचा प्रश्नही सोडवले गेलेच पाहिजेत. शेतकऱ्यांचे कर्जही माफ झाले पाहिजे.आता शिवसैनिकांनी आरामात राहू नका, युती झाली आता जनतेचे आशीर्वाद मिळवण्याची वेळ आहे.एकवेळ मत मागून मिळतील, पण जनतेचे आशीर्वाद मागून मिळत नाहीत.अनेक योजना जाहीर झाल्या आहेत, त्या राबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत केंद्र सुरू करावीतयुतीने न लढता आपण वेगळं लढत होतो, तेव्हा विरोधकांना माज चढला होता. पण, युती झाल्यानंतर कुठेही त्यांच्या सभा झाल्या नाहीतराधाकृष्ण विखेपाटील म्हणाले की ईडीच्या भीतीने यांनी युती केली, ईडीची भीती कुणाला, तुम्हाला. या ईडापिडा तुमच्याकडे आहेत. आमच्याकडे नाहीतआम्ही जे काही केलं ते खुलेपणाने केलं. पण, विरोधी पक्षातून जो टीका करेल तो पुन्हा त्या पक्षात राहीलच याची खात्री जनतेला राहिलेली नाहीआज आपण सत्तेपेक्षाही लोकांसाठी एकत्र आलो आहोत. आम्हाला सत्ता गोरगरीबांसाठी हवी आहे 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद