शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘उचलेगिरी’ अडचणीत

By admin | Updated: July 15, 2016 01:11 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय ताळमेळाचा संयम अलीकडे संपला असून, मालमत्ताकर वसुलीसाठी वाट्टेल ते उपाय करून पालिका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय ताळमेळाचा संयम अलीकडे संपला असून, मालमत्ताकर वसुलीसाठी वाट्टेल ते उपाय करून पालिका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. पोलिसांसमोर बड्या कर थकबाकीदारांना उभे करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता स्थावर ऐवजी जंगम मालमत्ता जप्त करण्याचा विचार पालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी सुरू केला आहे. मनपाच्या ‘घरगुती उचलेगिरी’ ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कडाडून विरोध केला. महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी याप्रकरणी पालिकेत एका बैठकीत अशा पद्धतीने कर वसुलीचा विचारही प्रशासनाने डोक्यात आणू नये, असा सल्ला प्रशासनाला दिला. मनपाची कर वसुली अडचणीत आली आहे. उपाययोजनेऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.घरगुती मालमत्ताधारकांनी सुमारे ८५ कोटी रुपयांची थकबाकी अनेक वर्षांपासून भरलेली नाही. जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडील टी. व्ही., दुचाकी वाहन, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याची कारवाई मनपाकडून करण्याचा विचार सुरू आहे. ४२९० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी कर अदालत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १ लाख ३१ हजार नागरिकांनी गेल्या १० वर्षांत मालमत्ताकरापोटी एक रुपयाही मनपाकडे भरला नाही. ४चालू आर्थिक वर्षात मनपाने ३६८ कोटींच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रत्येक वॉर्डातील १०० मोठ्या थकबाकीदारांना कर अदालतीसाठी बोलावण्यात येणार आहे. निवासी मालमत्ताधारकांकडे जास्त कर थकीत असल्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात येणार आहे. ४महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १२८ नुुसार घरातील ऐवज जप्त करण्याची तरतूद आहे. टी. व्ही., दुचाकी, कपाट, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे, असा प्रशासनाचा दावा आहे. 1१ लाख ३१ हजार मालमत्ताधारकांनी गेल्या १० वर्षांत करापोटी एक रुपयाही मनपात भरला नाही. अशा घरगुती थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा विचार पालिकेच्या डोक्यात आला कुठून, असा प्रश्न आहे. हा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे.2मनपा अधिनियमात कर वसुलीसाठी स्थावर मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. जंगम मालमत्ता जप्त करण्याची तरतूद ही सभागृहाच्या मान्यतेनुसार होऊ शकते. परंतु अशा पद्धतीने कर वसुली करणे योग्य नसल्याचे मत सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रकरणी टीकेचे लक्ष्य केले.