शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शेतीसाठी ड्रेनेजमधून पाणी घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 4:28 PM

ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या मनपा पथकावर दगडफेक करण्यात आली होती

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेमधून शेतीसाठी चोरून वीज आणि पाणी घेताना तीन शेतकऱ्यांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज, सोमवारी (दि. १८ ) दुपारी २ वाजेच्या सुमारास पावरलूम परिसरात घडली. यासोबतच चार शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. 

हर्सूल परिसर ते झाल्टापर्यंत महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजनेतून शहराचे सांडपाणी वाहते. यातील पाण्यावर काही शेतकरी शहराच्या आसपासच्या भागात शेती करतात. पावरलूम परिसरात अशाच प्रकारे ड्रेनेजचे पाणी चोरून शेती केली जाते. आज दुपारी या भागातील ड्रेनेज लाईनवरील चेंबरवर लावलेल्या पाण्याच्या मोटारीस दुरुस्त करताना तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या चार शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच नागरिकांनी सुद्धा बचावकार्य सुरु केले आहे. जनार्दन विठ्ठल साबळे (55), दिनेश जगन्नाथ दराखे (40, दोघे रा. चिकलठाणा) व रामेश्वर केरुबा डांबे (रा.निकलक, ता. बदनापूर,जालना )  अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. मृतामधील रामेश्वर यांचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. तर रामकिसन माने , उमेश कावडे, प्रकाश केरुबा वाघमारे आणि नवनाथ रंगनाथ कावडे (रा. चिखलठाणा ) या चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनेने खळबळ उडाली आहे. 

मनपा पथकावर केली होती दगडफेक मागील काही दिवसांपासून शहराच्या जवळील शेतीसाठी भूमिगत गटारीमधून शेतकरी पाणी चोरत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली. न्यायालयाने याची नोंद घेत महानगरपालिकेने या शेतकऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी असे आदेश दिले. यानुसार महानगरपालिकेची पथक दोन वेळेस या भागात कारवाईसाठी गेले होते. मात्र, शेतकऱ्याने दगडफेक केल्याने पथकाला माघार घ्यावी लागली होती. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDeathमृत्यूFarmerशेतकरीPoliceपोलिसagricultureशेती